AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia : पाऊस आला धाऊन, पिकं गेली वाहून, गोंदियात 208 हेक्टरातील पिकांवर पाणी, कृषी विभागाचे धोरण काय?

खरीप हंगामातील काही क्षेत्रावर धान पिकांची लागवड करताच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पिकांची पाहणी करणेही शक्य नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने कृषी विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत.

Gondia : पाऊस आला धाऊन, पिकं गेली वाहून, गोंदियात 208 हेक्टरातील पिकांवर पाणी, कृषी विभागाचे धोरण काय?
पावसाचे पाणी शेतमजमिनीत साचल्याने धान पिकांचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 23, 2022 | 11:02 AM
Share

गोंदिया : जुलैच्या पहिल्या दिवसापासून राज्यात पावसाने हाहाकार घातला आहे. (Vidarbha Farmer) विदर्भावर पावसाची कधी नव्हे ती अधिकची कृपादृष्टी राहिलेली आहे. त्यामुळे हा पाऊस नुकसानीचा ठरलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात पावसाने उसंत घेतली असली तरी ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस हा सुरुच आहे. यामुळे धोका अद्यापही टळलेला नाही. मध्यंतरी सलग 15 ते 20 दिवस झालेल्या पावसामुळे (Kharif Season) खरिपातील पिके तर वाहून गेलीच आहेत पण शेत जमिनीही खरडून गेल्याचे चित्र गोंदिया जिल्ह्यात आहे. कृषी विभागाकडून आता पीक पाहणी आणि पंचनाम्याला सुरवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल 208 हेक्टरावरील (Paddy Crop) धान पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय 8 दिवसांमध्ये या संदर्भातला अहवाल तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंचानाम्याला सुरवात

खरीप हंगामातील काही क्षेत्रावर धान पिकांची लागवड करताच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पिकांची पाहणी करणेही शक्य नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने कृषी विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत. आतापर्यंतच्या पाहणीतून धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरवात झाली असून आर्थिक मदत मिळे असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस

विदर्भात दरवर्षी कमी पावसामुळे धान पिकाची लागवड होत नाही. पण यंदा चित्र बदलले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने असे काय थैमान घातले आहे त्यामुळे लागवड झालेल्या क्षेत्रातील पिकांवर पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे वाढ तर खुंटलीच आहे पण सततच्या पावसामुळे पाण्याचा निचराही होत नाही. हंगामाच्या सुरवातीलाच सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने उत्पादन घटण्याचा धोका कायम आहे. पंचनाम्यांना सुरवात झाली असून मदतीबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

धान पिकाचे सर्वाधिक नुकसान

धान पीक हेच खरिपातील मुख्य पीक आहे. अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी लागवड केली मात्र, काही क्षेत्रात लागवड होताच सुरु झालेला पाऊस हा सलग 20 दिवस कायम राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील 208 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय आणखी वाढ होईल असाही अंदाज कृषी विभागाचा आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा विदर्भातील शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.