AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती?

राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2 जुलैपर्यंत राज्यातील तब्बल 222 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला

बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती?
| Updated on: Jul 03, 2020 | 8:36 AM
Share

नागपूर : ‘कोरोना’च्या संकट काळातही बळीराजाला समाधानकारक पावसामुळे चांगला दिलासा मिळाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत राज्यात सर्वदूर पुरेसा पाऊस पडल्याने, शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2 जुलैपर्यंत राज्यातील तब्बल 222 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला. (Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

महाराष्ट्रात एकूण सरासरीच्या 112 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर राज्यातील 69 तालुक्यात सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

नाशिक आणि औरंगाबाद विभागावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान आहे. या दोन्ही विभागात आतापर्यंत सरासरीच्या 150 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर अमरावती आणि पुणे विभागातही सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला.

सुरुवातीच्या दिवसांतच पावसानं चांगली बॅटिंग केल्यामुळे, खरीप पिकांना मोठा आधार झाला असून, भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यासही पावसाचा चांगलाच फायदा झाला.

सरासरी पाऊसमान तालुक्यांची संख्या

100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त – 222 तालुके

75 ते 100 टक्के पाऊस – 62 तालुके

50 ते 75 टक्के पाऊस – 50 तालुके

25 ते 50 टक्के पाऊस – 19 तालुके

फोटो : कृषी विभाग, महाराष्ट्र सरकार

(Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

राज्यातील सहा विभागापैकी कुठल्या विभागात किती पाऊस पडला?

विभाग – पावसाची टक्केवारी

कोकण – 81.7 टक्के

नाशिक – 150.3 टक्के

पुणे – 101.2 टक्के

औरंगाबाद – 151.6 टक्के

अमरावती – 124.1 टक्के

नागपूर – 96 टक्के

राज्यात एकूण सरासरीच्या 112.6 टक्के पावसाची नोंद झाली

संबंधित बातमी :

पेरलं ते उगवलंच नाही! वर्ध्यात बोगस बियाणाने शेकडो एकरवरील सोयाबीन पेरणी बाद

(Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.