Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाबीजचा मोठा निर्णय : राज्यभरातील बिजोत्पादक बियाणांच्या दरावर काढला तोडगा, बोनसचाही लाभ

शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेता महाबीजने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यभरातील बिजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकच दर राहणार आहे. त्यामुळे दरातील विषमता नष्ट होणार असून सर्वांना समान दर मिळणार आहे. शिवाय सन 2016-17 पासून जो बोनस दिला जात आहे तो कायम ठेवला जाणार असल्याचा निर्णय महाबीजच्या बैठकीत पार पडलेला आहे.

महाबीजचा मोठा निर्णय : राज्यभरातील बिजोत्पादक बियाणांच्या दरावर काढला तोडगा, बोनसचाही लाभ
सोयाबीन बिजोत्पादन
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 12:26 PM

अकोला : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही हंगामातील बियाणांचा पुरवठा करण्यामध्ये (Mahabij) महाबीज चा मोठा वाटा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रक्रिया सुरु आहे. महाबीजचे बियाणेच आजही प्रमाणीत मानले जाते. शिवाय शेतकऱ्यांचाही विश्वास अधिक दृढ होत आहे. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहे ती (seed production process) बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची. या शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेता महाबीजने मोठा निर्णय घेतला आहे. आता (Maharashtra) राज्यभरातील बिजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकच दर राहणार आहे. त्यामुळे दरातील विषमता नष्ट होणार असून सर्वांना समान दर मिळणार आहे. शिवाय सन 2016-17 पासून जो बोनस दिला जात आहे तो कायम ठेवला जाणार असल्याचा निर्णय महाबीजच्या बैठकीत पार पडलेला आहे.

यापूर्वी कशी होती पध्दत..

महाबीजने ठरवून दिलेल्या प्रमाणित बियाणांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक रक्कम दिली जात होती. मात्र, जिल्ह्यात त्या बियाणाचे दर काय आहेत त्यावरुनच दर निश्चित केले जात होते. मात्र, जिल्हानिहाय दर हे वेगवेगळे असल्याने त्यामध्ये तफावत निर्माण होऊन शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. शिवाय तो रास्तही असून त्यावर तोडगा काढण्याच्या अनुशंगाने महाबीजने आता राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील दरांचा आढावा घेऊन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी होणार नाही.

यामुळे घ्यावा लागणार निर्णय

जिल्हानिहाय दरामध्ये तफावत असल्याने दरवर्षी हंगाम झाला की शेतकरी हे फरकाची मागणी करीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी पूर्ण तर करावीच लागत होती पण पुन्हा त्यांची नाराजी होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागत असे. त्यामुळे गतवेळचा फरक 400 अधिक 200 असा 600 देण्याची घोषणाच सर्वसाधारण सभेत करण्यात आली शिवाय दरवर्षी फरकावरून गदारोळ नकोच म्हणून एकसमान दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बिजोत्पादक शेतकऱ्यांना बोनसही

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन करावे या अनुशंगाने 2016-17 पासून बोनस दिला जात आहे. यामध्ये हरभरा पिकाला 131 रुपये प्रतिक्विंटल, सोयाबीनला 2018-19 मध्ये 200 तर 19-20 मध्ये 500 रुपये असा बोनस दिला जात असल्याचे अॅग्रोवन मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. ठिबकसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत कऱण्यासाठी 10 टक्के सीएसआर मधून निधी देण्याची तयारी संचालक वल्लभराव देशमुख यांनी दर्शवली आहे. त्यामुळे शासनाकडून 80 टक्के अनुदान तर महाबिजकडून 10 असे 90 टक्के अनुदानाचा लाभ बिजोत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Vineyard : अवकाळी, डाऊनी मिल्डयु नंतर आता द्राक्ष बागायतदारांसमोर नवेच संकट, काय आहे उपाययोजना ?

देशी अन् गोल्डन सीताफळाची चवच न्यारी, मुख्य पिकातून नाही पण हंगामी पिकांतून शेतकऱ्यांचे वाढले उत्पन्न

Rabi Season : वेळेत पूर्वसूचना दाखल करा तरच मिळणार नुकसानभरपाई, काय आहेत कृषी संचालकांच्या सुचना ?

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.