AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Organic Farm : कृषी विद्यापीठात आता सेंद्रिय सर्टिफिकेट अभ्यासक्रम, जनजागृती अन् रोजगाराची संधीही

कृषी विद्यापीठातून सेंद्रिय सर्टिफिकेट हा पहिल्यांदाच उपक्रम राबवला जात आहे. सेंद्रिय पध्दतीने उत्पादन घेण्याचे महत्व आणि त्यासंबंधीचे बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासंदर्भात यामध्ये मार्गदर्शन होणार आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठात शासकीय स्तरावरुन अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. मूळ फ्रान्समधील असेलेली 'इकोसर्ट' ही आंतरराष्ट्रीय संस्था व पंदेकृविने एकत्रितपणे हा अभ्यासक्रम तयार केला असून या अभ्यासक्रमाच्या आधारावर सेंद्रिय शेतीचे धड गिरवले जाणार आहेत.

Organic Farm : कृषी विद्यापीठात आता सेंद्रिय सर्टिफिकेट अभ्यासक्रम, जनजागृती अन् रोजगाराची संधीही
सेंद्रीय शेती
| Updated on: Jul 15, 2022 | 3:35 PM
Share

अकोला : गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या माध्यमातून (Organic Farm) सेंद्रिय शेतीचे महत्व निदर्शनास आणून दिले जात आहे. (Central Government) केंद्र सरकारच्या माध्यमातून तर अनेक उपक्रमही राबवले जात आहेत. शिवाय आता सेंद्रिय पध्दतीने पिकवलेले अन्नधान्य आणि भाजीपाल्याला अधिकची मागणी आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीचे भवितव्य पाहता आता सेंद्रिय शेतीचा अभ्यास केलेल्या (Agree Student) विद्यार्थ्यांना सेंद्रिय सर्टिफिकेट दिले जाणार आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. यंदाच्या वर्षापासून हे सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या अभ्यासक्रमात तर बदल होईलच पण विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर त्याचे व्यवसायाचेही धडे मिळणार आहेत.

अभ्यासक्रम काय असणार?

कृषी विद्यापीठातून सेंद्रिय सर्टिफिकेट हा पहिल्यांदाच उपक्रम राबवला जात आहे. सेंद्रिय पध्दतीने उत्पादन घेण्याचे महत्व आणि त्यासंबंधीचे बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासंदर्भात यामध्ये मार्गदर्शन होणार आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठात शासकीय स्तरावरुन अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. मूळ फ्रान्समधील असेलेली ‘इकोसर्ट’ ही आंतरराष्ट्रीय संस्था व पंदेकृविने एकत्रितपणे हा अभ्यासक्रम तयार केला असून या अभ्यासक्रमाच्या आधारावर सेंद्रिय शेतीचे धड गिरवले जाणार आहेत.

काळाच्या ओघात सेंद्रिय शेतीचे वाढते महत्व

बदलत्या काळाच्या ओघाच निरोगी आरोग्यासाठी पुन्हा सेंद्रिय अन्नधान्य व उत्पादनांच्या मागणीत वाढ होत आहे. अधिकच्या मागणीमुळे दरही चांगला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सेंद्रिय शेती पध्दतीच्या क्षेत्रात वाढ व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारही प्रयत्न करीत आहे. या सर्वांचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या दृष्टीने हा कोर्स फायदेशीर ठरणार आहे. असे असले तरी सेंद्रिय पीक आहे की नाही यासाठी काही मापदंड ठरवून दिले आहेत. ते पूर्ण करण्यासाठीच या सर्टिफिकेट कोर्सचा उपयोग होणार आहे.

यंदाच्या वर्षापासूनच अभिनव उपक्रम

सध्याही काही संस्थांकडून हा सर्टिफिकेट कोर्स करुन दिले जात आहेत. यामध्ये ‘इकोसर्ट’ ही एक महत्वाची संस्था आहे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र, सेंद्रिय शेतीचे महत्व आणि गरज ओळखून विद्यापीठाअंतर्गत हा सर्टिफिकेट कोर्स सुरु केला जाणार आहे. कृषी विद्यापीठातील तज्ञ हे मार्गदर्शन करणार आहेत. ऑगस्टपासून या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरवात होणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी सांगितले आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.