AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vegetable Price hike : या जिल्ह्यात भाजीपाला महागला, व्यापाऱ्यांनी सांगितलं कारण

Maharashtra Farmer : महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. बहुतांश ठिकाणी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Vegetable Price hike : या जिल्ह्यात भाजीपाला महागला, व्यापाऱ्यांनी सांगितलं कारण
Vegetable Price hikeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 03, 2023 | 11:55 AM
Share

महाराष्ट्र : महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक जिल्ह्यात मागच्या आठदिवसांपासून पाऊस सुरु झाला आहे. काही जिल्ह्यात मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही भागात अजिबात पाऊस न झाल्यामुळे शेतकरी (farmer) वर्ग मोठ्या चिंतेत आहे. कारण जूनच्या महिन्यात ज्या पध्दतीने पाऊस व्हायला हवा होता. त्यापद्धतीने पाऊस झालेला नाही. राज्याच्या अनेक भागात पावसाने ओढ दिली असली तरी, सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून असल्यामुळे आदिवासी शेतकरी (farmer news) सुखावला आहे. सध्या आदिवासी भागातील शेतीही पावसाने तुडुंब भरली असून पावसाअभावी करपू लागलेल्या भातसाळीच्या रोपांनाही जीवदान मिळालं आहे.

वाशिममध्ये भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. टोमॅटो 120 रुपये, हिरवी मिरची 160 रुपये प्रति किलो आणि कोथिंबीर 50 रुपये जुडीने विकल्या जात आहेत. बाजारात फुल कोबी, भेंडी, दोडकी आणि वांग्याचा दर 80 रुपये प्रति किलो झाला आहे. काही दिवसांनंतर भाजीपाला आणखी महाग होणार आहे.

मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या महिन्यात टोमॅटो २० रुपये किलो होता. सध्या टोमॅटोचा दर १०० रुपये किलो झाला आहे. विशेष म्हणजे काही शहरात १२० रुपये किलो टॅमोटो मिळत आहे. मान्सून महाराष्ट्रात उशीरा दाखल झाल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे.

सध्याचे भाज्याचे दर

टोमॅटो – 80 ते 120 रुपये किलो भेंडी – 40 रुपये किलो दुधीभोपळा – 40 रुपये किलो कोबी – 50-60 रुपये किलो कारले – 50-60 रुपये किलो शिमला मिरची – 50 ते 60 रुपये किलो वांगी – 30 रुपये किलो हिरवी मिरची – 60 रुपये किलो लिंबू – 60 रुपये किलो अदरक – 250 रुपये किलो

भाज्याचे दर का वाढले ?

देशात अनेक ठिकाणी मान्सून वेळेत दाखल झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला करपून गेला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाने भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. सध्या भाव अधिक वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा अधिक फटका बसला आहे.

सध्या भाज्याचे वाढलेले दर कमी करण्यासाठी सरकार पुढाकार घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढच्या पंधरा दिवसात टोमॅटोची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव, रोहित कुमार सिंग यांनी हिमाचल प्रदेशातील सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांमधून या दोन जिल्ह्यामधून टोमॅटोचा चांगला पुरवठा झाल्यानंतर दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किमती लगेच खाली येतील. त्याचबरोबर केंद्र सरकार किमती कमी करण्यासाठी उपाय शोधत आहे.

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.