AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कार चालक आणि प्रवाशांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. तुमचा कार प्रवास आता आणखी सुरक्षित होणार आहे.

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार
एअरबॅग्समुळे कारची किंमत 4,000 रुपयांपर्यंत वाढू शकते.Image Credit source: File
| Updated on: Mar 27, 2022 | 9:05 PM
Share

मुंबई : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कार चालक आणि प्रवाशांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. तुमचा कार प्रवास आता आणखी सुरक्षित होणार आहे. कारण आता 8 सीटर कारसोबत 6 एअरबॅग्स देणे वाहन उत्पादक कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. रस्ता सुरक्षेसंदर्भातील हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. नवीन नियमांमुळे (New Car Rules)कार कंपन्यांना कारच्या किमती वाढवता येतील. सुरक्षा मानकांचे (Safety Standards) काटेकोर पालन भारतात महत्त्वाचे बनले आहे. मोठ्या कारमधील 6 एअरबॅग वाहनांतील प्रवाशांचे संरक्षण करतील. 8 आसनी (सीटर) वाहनांमध्ये 6 एअरबॅग (Airbag) अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. सरकारने यापूर्वीच सर्व प्रवासी वाहनांना किमान दोन एअरबॅग असणे बंधनकारक केले आहे.

ड्रायव्हरसाठी (चालकासाठी) एअरबॅगची आवश्यकता जुलै 2019 पासून लागू करण्यात आली होती, तर 1 जानेवारी 2022 पासून पुढच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी (चालकासह) दोन एअरबॅग अनिवार्य आहेत. प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनांमध्ये आणखी चार एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत, जेणेकरून समोरासमोर होणारी टक्कर आणि बाजूने होणारी टक्करींदरम्यान प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, किंबहुना हा धोका कमी होईल.

प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी सरकारचं पाऊल

मागच्या सीटभोवती दोन एअरबॅग आणि दोन ट्यूब एअरबॅग्ज अनिवार्य केल्यामुळे सर्व प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. गडकरी म्हणाले की, भारतात कार प्रवास सुरक्षित करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये महामार्गावर एकूण 1.16 लाख रस्ते अपघात झाले. ज्यामध्ये 47,984 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाहनांच्या किंमती वाढणार?

एअरबॅग्समुळे कारची किंमत 4,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. कार उत्पादक कंपन्या कारमध्येच अधिक एअरबॅग्ज बसवू शकतात. पण कार आता तयार आहे, आणि जर तुम्हाला ती पुन्हा बदलायची असेल तर कारची किंमत 50,000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

सिंगल चार्जवर 220 KM रेंज, Komaki DT3000 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच

सर्वात मोठी चाकं असलेली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Car Insurance | वाहन विमा घेताय? या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष; चांगल्या डीलसाठी रहा आग्रही

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.