AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budjet 2024 : दक्षिण भारताला स्वतंत्र देश करा, का आणि कुणी केली मागणी? अर्थसंकल्पाचा संबंध काय?

कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही असा दावा करतानाच दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही अशी मागणी करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला उत्तर देताना ही मागणी करण्यात आली.

Budjet 2024 : दक्षिण भारताला स्वतंत्र देश करा, का आणि कुणी केली मागणी? अर्थसंकल्पाचा संबंध काय?
NIRMALA SITARAMNImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Feb 01, 2024 | 10:44 PM
Share

नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही असे सांगत संसदेत एका खासदाराने वेगळा वाद निर्माण केला आहे. अर्थसंकल्पाबाबत दक्षिण भारतावर अन्याय होत आहे. जो पैसा दक्षिण भारतात पोहोचायला हवा होता. तो वळवून उत्तर भारतात वितरित केला जात आहे असा आरोपही या खासदाराने केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला उत्तर देताना कॉंग्रेस खासदार डीके सुरेश यांनी हा आरोप केला आहे.

हिंदी पट्टय़ाने दक्षिण भारतावर लादलेल्या अटींमुळे वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही. कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही, असा आरोप काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी केला.

खासदार डीके सुरेश यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी कॉंग्रेसवरच टीका केली. काँग्रेस पक्षाचा इतिहास ‘फोडा आणि राज्य करा’ असा राहिला आहे. पण, त्यांचे खासदार डीके सुरेश पुन्हा तीच खेळी खेळत आहेत. त्यांना देशाचे उत्तर आणि दक्षिण असे विभाजन करायचे आहे अशी टीका केलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये कर्नाटकला देण्यात आलेल्या कराचा वाटा वाढला आहे. एकीकडे त्यांचे नेते राहुल गांधी त्यांच्या ‘जोडो’ यात्रेद्वारे देशाला ‘एकत्र’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे देश तोडण्यासाठी वाकलेला खासदार आपल्याकडे आहे. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ हा काँग्रेसचा विचार आहे, असे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले.

वसाहतवाद्यांनी स्वीकारलेल्या परिस्थितीपेक्षा ही वाईट विचारसरणी आहे. कन्नड जनता असे कधीही होऊ देणार नाही. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि काँग्रेसमुक्त भारताची मोहीम यशस्वी होईल याची काळजी घेऊ, असा टोलाही सूर्या यांनी लगावला.

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.