AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या गाडीत 100% शुद्ध पेट्रोल टाकलं जात नाही, ‘या’ गोष्टीची भेसळ! नेमकं नुकसान काय?

आता आपण असा विचार करत असाल की, पेट्रोल पंपवाले लोक हे चुकीचे करीत आहेत, त्यांनी हे करू नये. पण हे पेट्रोल पंपचालक ते स्वबळावर करत नसून सरकारच्या धोरणामुळे हे केले जात आहे. 

तुमच्या गाडीत 100% शुद्ध पेट्रोल टाकलं जात नाही, 'या' गोष्टीची भेसळ! नेमकं नुकसान काय?
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 7:20 PM

नवी दिल्लीः जेव्हा जेव्हा आपण पेट्रोल पंपावरून वाहनात पेट्रोल टाकता, तेव्हा याचा अर्थ असा होत नाही की आपल्या वाहनात 100% शुद्ध पेट्रोल टाकले जाते. या पेट्रोलमध्ये एक विशेष प्रकारचा पदार्थही मिसळला जातो आणि एक विशेष गोष्ट म्हणजे हा विशिष्ट पदार्थ आपल्या वाहनासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. आता आपण असा विचार करत असाल की, पेट्रोल पंपवाले लोक हे चुकीचे करीत आहेत, त्यांनी हे करू नये. पण हे पेट्रोल पंपचालक ते स्वबळावर करत नसून सरकारच्या धोरणामुळे हे केले जात आहे.

वाहनाचे नुकसान कसे होते हे जाणून घेऊयात

अशा परिस्थितीत पेट्रोल पंप इंधनात काय मिसळत आहेत आणि वाहनाचे नुकसान कसे होते हे जाणून घेऊयात. तसेच या विशिष्ट भेसळीत सरकारचे धोरण काय आहे हे देखील तुम्हाला कळेल. याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टी जाणून घ्या…

कंपन्यांना देशभरात पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी

भारत सरकारने पेट्रोल कंपन्यांना देशभरात पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी दिलीय. यामुळे आता पावसाळ्यात वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, पेट्रोल पंप मालकदेखील या निर्णयामुळे नाराज आहेत. पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनना असा विश्वास आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते, याची लोकांना माहिती नाही. वाहन अडचणीत असल्यास लोक पेट्रोल पंप मालकांविरुद्ध तक्रार करतात.

पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचे सरकारचे धोरण

राजस्थान स्थित पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे सरचिटणीस संदीप भागेरिया यांनी टीव्ही 9 ला सांगितले, “पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचे सरकारचे धोरण आहे. या कारणास्तव हे पेट्रोलमध्ये मिसळले जाते. आता ही मात्रा 10 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची चर्चा सुरू आहे आणि इथेनॉलकडे सरकारचे विशेष लक्ष आहे.

गाडीचे काय नुकसान होते?

अहवालानुसार, जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते, तेव्हा ते पेट्रोल पाण्याशी संपर्कात आल्यास सर्व इथेनॉल पाण्याचे बनते, जे वाहनाच्या इंजिनवर परिणाम करू शकते. असे सांगितले जात आहे की, इथेनॉल उसाच्या रसापासून बनवले गेलेय आणि जर ते पेट्रोलमध्ये मिसळले आणि पेट्रोलचा पाण्याशी संपर्कात आला तर पेट्रोलमध्ये आढळणारे सर्व इथेनॉल पाण्याचे होऊ शकते.

सरकारच्या धोरणानुसारच पेट्रोल पंपचालकांककडून कार्यवाही

संदीप भागेरिया यांनीही सांगितले की, ‘आता ग्राहक अनेक पेट्रोल पंपावर अशा तक्रारी घेऊन येत आहेत आणि पेट्रोल पंपावर आरोप करीत आहेत. मात्र, सरकारच्या धोरणानुसारच हे पेट्रोल पंपचालक करीत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने किंवा पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोलमध्येही इथेनॉल मिश्रित असल्याचा प्रचार केला पाहिजे आणि अशा स्थितीत वाहनाची टाकी कशी संरक्षित करावी याबद्दल लोकांना जागरूक केले पाहिजे.

काय करावे?

संदीप भगेरिया म्हणाले, ‘खरंच पावसाळ्यात किंवा कधी कधी कार धुताना, पेट्रोल टाकीमध्ये हलके पाणी गेले तर लोक अडचणीत येऊ शकतात. अशा परिस्थितीत लोकांनी यावेळी त्यांच्या कारच्या पेट्रोल टँकची विशेष काळजी घेतली पाहिजे.

संबंधित बातम्या

PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या

ATM मधून रंग लागलेली नोट बाहेर आली तर काय करावे? नियम काय सांगतो?

100% pure petrol is not put in your car, mixture of Ethanol, What exactly is the loss?

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.