AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत, नंतर बायकोचे दागिनेही विकावे लागले; अनिल अंबानी कसे बाहेर पडले ?

मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची एकूण संपत्ती 42 अब्ज डॉलर होती. पण काही वेळातच त्यांचे झपाट्याने पतन झाले, ते प्रचंड कर्जात बुडाले. एक वेळ अशी आली की त्यांना पत्नीचे दागिनेही विकावे लागले.

जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत, नंतर बायकोचे दागिनेही विकावे लागले; अनिल अंबानी कसे बाहेर पडले ?
अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते
| Updated on: Apr 06, 2024 | 2:58 PM
Share

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांची ओळख. मुकेश यांच्याप्रमाणेच त्यांचा भाई अनिल अंबानी हेदेखील एकेकाळी रिलायन्सचा चेहरा होते. मोठ्या भावासोबत मतभेद आणि विभाजन झाल्यानंतर अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.त्यांची एकूण संपत्ती 42 अब्ज डॉलर होती. विभाजनानंतर मुकेश अंबानी यांनी अथक मेहनतीने त्यांचा उद्योग वाढवला आणि आज ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. पण दुसरीकडे काही काळातच त्यांचा लहान भाऊ अनिल अंबानी यांनी सर्व काही धुळीला मिळवलं. ते मोठ्या आर्थित संकटात सापडले. एक वेळ अशी आली की अनिल यांच्याकडे त्यांच्या वकिलाची फी देण्यासाठी देखील पैसे नव्हते. तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीचे दागिने विकून फी भरावी लागली. चुकीच्या गोष्टींची निवड आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याने मोठ्यात मोठं साम्राज्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं यांच उदाहरण म्हणजे अनिल अंबानीचे हे अपयश.

उंची महालातून जमीनीवर येण्यसाठी अनिल अंबानी हे स्वत:च जबाबादार होते. त्यांच्या निवडी याच त्याच्या पतनासाठी कारणीभूत ठरल्या. योग्य नियोजन न करता किंवा दूरदृष्टी न ठेवता त्यांनी एकाच वेळी अनेक कंपन्या सुरू केल्या. दूरसंचार, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि मनोरंजन क्षेत्रात मोठा खेळाडू बनण्याचे स्वप्न अनिलने पाहिले. पण, त्याच्या सर्व योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही. अपेक्षेपेक्षा जास्त झालेला खर्च, चुकीचे नियोजन आणि कमी परतावा यामुळे अनिल अंबानी हे कर्जात बुडू लागले.

दिवाळखोर झाले अनिल अंबानी

अनिल अंबानी यांच्या कंपनीवरील कर्ज वाढू लागले. त्यामुळे त्यांना त्यांच्या कंपन्या एकामागोमाग एक अशा विकायला लागल्या. चुकीच्या निर्णयांमुळे त्यांची टेलिकॉम कंपनी बुडली. त्या कंपनीचे कर्ज 25 हजार कोटींवर पोहोचले. अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमीवर चिनी बँकांकडून कर्ज घेतले. पण, त्यांना त्या कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यानंतर त्यांना लंडन येथील न्यायालयात हजर राहवे लागले. न्यायलयाने त्यांना तीन बँकांचे सुमारे 5446 कोटी रुपये परत करण्याचे निर्देश दिले. माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नाही असे सांगत अनिल अंबानी यांनी न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित केले. त्यांच्यावर अंदाजे 40,000 कोटी रुपयांचे कर्ज होते.

वकिलांची फी भरण्यासाठीही नव्हते पैसे

अनिल अंबानी यांचे नेटवर्थ शून्य झाले होते. वर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे त्यांच्या वकिलांची फी भरण्यासाठीदेखील पैसे नव्हते. अखेर त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने विकून वकिलांना फी दिली. एका कारशिवाय आपल्याकडे काहीच उरले नसल्याचे अनिल यांनी सांगितले. ते साधं जीवन जगत आहेत. फेब्रुवारी 2023 पर्यंत, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 250 कोटी रुपये इतकी होती. अनिल अंबानी यांचं मुंबईत 17 मजली घर आहे. त्यांच्या रिलायन्सने नुकतेच तीन बँकांचे कर्ज फेडले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.