AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Economic crisis in Sri Lanka; श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात, इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज

आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडलेल्या श्रीलंकेला (Sri Lanka) पुन्हा एकदा भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्रीलंकेला इंधन आयातीसाठी (Fuel Import) 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे.

Economic crisis in Sri Lanka; श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात, इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 23, 2022 | 2:40 PM
Share

आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडलेल्या श्रीलंकेला (Sri Lanka) पुन्हा एकदा भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्रीलंकेला इंधन आयातीसाठी (Fuel Import) 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत श्रीलंकेच्या आर्थमंत्र्यांनी माहिती दिली. ते याबाबत बोलताना म्हणाले की, भारताने श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. हा श्रीलंकेसाठी सध्या परिस्थितीमध्ये मोठा आधार आहे. सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. आम्ही या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या संकटातून कसा मार्ग काढता येईल? याबाबत आयएफएमसोबत चर्चा सुरू आहे. श्रीलंका लवकरच या संकटातून बाहेर पडेल. अशी खात्री आहे. भारताने संकट काळात श्रीलंकेला मदत केली आहे, त्यासाठी आम्ही भारताचे आभार मानतो.

‘भारताकडून मदतीची अपेक्षा’

पुढे बोलताना अर्थमंत्र्यांनी म्हटले की, सध्या श्रीलंकेचे विदेशी मुद्रा भंडार झपाट्याने कमी होत आहे. आयातीसाठी पुरेशा प्रमाणात चलनसाठा नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. दुसरीकडे श्रीलंकेत माहागाई देखील गगनाला भिडली आहे. त्यामुळे वस्तूंच्या आयातीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. अशा स्थितीमध्ये श्रीलंका भारताकडून मदतीची अपेक्षा करत आहे. भारताने श्रीलंकेला इंधन आयातीसाठी 50 कोटी डॉलरच्या मदतीला मंजुरी दिली आहे. आम्हाला अशी आशा की, भारत क्रेडिट लाईनच्या रुपाने एक अब्ज डॉलरपर्यंत मदत करेल.

श्रीलंकेत बिकट परिस्थिती

श्रीलंकेची परिस्थिती बिकट बनली आहे. श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. इंधनाच्या आयातीसाठी पुरेसा चलनसाठा नसल्याने इंधन तुटवडा जाणू लागला आहे. इंधन तुटवड्यापाठोपाठ श्रीलंकेत वीज संकट देखील निर्माण झाले आहे. अन्नधान्य इतके महाग झाले आहे की, अन्नधान्य खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. श्रीलंकेत महागाई वाढल्याने सामान्य जनतेने सरकारवर रोष व्यक्त केला आहे. जनता आता सरकारविरोधात रस्त्यावर उतरू लागली आहे.

संबंधित बातम्या

India will be a superpower : अमेरिकेला मागे टाकत भारत होणार महासत्ता, इतक्या दिवसांत गरिबी काढणार पळ; गौतम अदानी यांचा दावा

RBI कडून सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 36 लाखांचा दंड! नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

सोन्याची लंका अन्नाला ‘महाग’, जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य, भारताकडूनही मदत

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.