AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावातच व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न बघताय का? तर सरकारच्या ‘या’ योजना करतील तुम्हाला मालामाल

गावात राहून व्यवसाय सुरू करायचं स्वप्न तुम्ही अजून फक्त कल्पनेत पाहताय का? तर केंद्र सरकारच्या ‘या’ योजना तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. त्यामुळे आजच योग्य योजना निवडा आणि तुमचं स्वप्न साकार करण्याचा प्रवास सुरू करा!

गावातच व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न बघताय का? तर सरकारच्या ‘या’ योजना करतील तुम्हाला मालामाल
सरकारी योजनाImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Apr 23, 2025 | 2:44 PM
Share

गावात राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत केवळ शहरांपुरताच मर्यादित असलेल्या बिझनेस संधी आता सरकारच्या विविध योजनांमुळे थेट ग्रामीण भागात पोहोचल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार केवळ कर्ज उपलब्ध करून देत नाही, तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली ट्रेनिंग आणि काही योजनांत थेट सबसिडी देखील देत आहे.

गावाकडील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम (PMEGP) ही योजना अतिशय फायदेशीर ठरते. या योजनेच्या माध्यमातून टेलरिंग युनिट, मसाला प्रक्रिया केंद्र, फर्निचर वर्कशॉप अशा विविध उद्योगांसाठी सरकारकडून थेट २५% ते ३५% पर्यंत सबसिडी दिली जाते. कमी गुंतवणुकीत उद्योग सुरू करण्याचा विचार असणाऱ्यांसाठी ही योजना एक उत्तम संधी आहे.

तुमच्याकडे जर एखादा नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना असेल, जसे की ऑर्गेनिक शेती, ऑनलाईन विक्री किंवा फार्म टेक्नोलॉजीसंबंधी एखादा नवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत तुम्हाला कर सवलत, सरकारी प्रशिक्षण आणि गुंतवणूक संधी मिळू शकते. स्टार्टअप्ससाठी सरकारच्या या योजनेचा ग्रामीण भागातही मोठा फायदा होत आहे.

शेतीपूरक व्यवसाय करायचा विचार करणाऱ्या शेतकरी आणि तरुणांसाठी राष्ट्रीय पशुधन मिशन हा एक मजबूत आधार ठरतो आहे. या योजनेच्या अंतर्गत डेअरी फार्मिंग, बकरीपालन आणि कुक्कुटपालन यासाठी विशेष कर्ज आणि सबसिडी दिली जाते, ज्यामुळे कमी भांडवलात व्यवसायाची सुरुवात करणे सहज शक्य होते.

लघु व्यवसायासाठी थेट आर्थिक मदतीची गरज भासल्यास प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) हा उत्तम पर्याय आहे. या योजनेअंतर्गत किराणा दुकान, सायकल रिपेअरिंग सेंटर, कपड्यांचं दुकान किंवा एखादं लघु मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी कोणतीही गॅरंटी न घेता थेट १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते, जे ग्रामीण भागातील अनेकांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करत आहे.

गावात स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न आता लांबचं राहिलेलं नाही, कारण केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून हे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी समोर आली आहे. या योजनांची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा जवळच्या जिल्हा उद्योग केंद्र अथवा बँकेत संपर्क साधून सल्ला घेऊ शकता. योग्य मार्गदर्शन घेतल्यास ग्रामीण भागातही यशस्वी व्यवसाय उभारणे शक्य आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.