AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donation | 19 वर्षी झाले लग्न, मीडियापासून कोसो दूर, दान केले 110,00,00,000 रुपये!

Donation | अनेक दिग्गज भारतीय उद्योजक दान करतात. काही जणांनी शैक्षणिक संस्था पण सुरु केल्या आहेत. परोपकारी आणि गरजूंच्या हितासाठी त्यांची मदत कामी येते. काहींनी मोठ-मोठ्या ट्रस्ट स्थापन केल्या आहेत. या यादीत आता एका लेखिकेचे नाव जोडल्या गेले आहेत. एका लेखिकेने कोट्यवधी रुपये दान केले आहेत.

Donation | 19 वर्षी झाले लग्न, मीडियापासून कोसो दूर, दान केले 110,00,00,000 रुपये!
| Updated on: Feb 17, 2024 | 2:29 PM
Share

नवी दिल्ली | 17 February 2024 : शिव नाडर, अझिम प्रेमजी, मुकेश अंबानी, रतन टाटा हे दानशूरांमधील मोठे नाव आहे. दानशूरांच्या यादीत हुरुन इंडियामध्ये एका दाम्पत्याने पण नाव कोरले आहे. सुष्मिता आणि सुब्रतो बागची असे त्यांचे नाव आहे. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलेंथ्रॉपिस्ट यादी 2023 अनुसार, सुष्मिता और सुब्रतो बागची हे दाम्पत्य भारतातील दानशुरांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 1100000000 रुपयांहून अधिक रक्कम दान केली होती. तर सुष्मिता बागची यांनी एकट्याने गेल्य वर्षी 2130000000 रुपये दान केले होते. इतके मोठे दान केले असताना पण त्या प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहतात.

ओडिशामध्ये झाला जन्म

सुष्मिता बागची यांचा जन्म कटकमध्ये झाला. त्या प्रसिद्ध ओडिशा लेखिका शकुंतला पांडा यांची कन्या आहेत. त्यांनी आईच्याच पावलांवर पाऊल टाकलं आहे. सुष्मिता बागची पण एक प्रसिद्ध उडिया लेखिका झाल्या. त्यांचे महिलांसाठीचे मासिक सुचरिता हे लोकप्रिय आहे. त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठात त्या व्याख्याता, लेक्चरर म्हणून रुजू झाल्या. त्या अवघ्या 15 वर्षांच्या असताना त्यांची पती सुब्रतो बागची यांच्याशी भेट झाली. त्यानंतर चार वर्षांनी दोघांनी लग्न केले.

आईकडून मिळली प्रेरणा

  • सुष्मिता यांना आईकडूनच लेखनाची प्रेरणा मिळाली. त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रवेश केला. माईंडट्रीची सहसंस्थपक आणि एक समाजसुधारक म्हणून सुष्मिता बागची यांनी ओळख निर्माण केली. तशी त्यांनी लेखिका म्हणून पण ओळख निर्माण केली. त्यांनी प्रवास वर्णन, लघुकथा, विविध संग्रह, इंग्रजी आणि ओडिशा भाषेत पाच कादंबरी लिहिल्या.
  • मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणारी एखादी व्यक्ती अथवा कुटुंब पहिल्या इंग्रजी कादंबरीचे मुख्य पात्र, एखाद्याला मानसोपचारतज्ज्ञ विश्वासार्ह आणि ओळखण्या योग्य वाटल्याशिवाय राहणार नाही. बागची यांच्या लिखाणाची अनेकांना तोंडभर स्तूती केली आहे. कौतुक केले आहे. बागची यांना त्यांच्या सामाजिक काम, लिखाणाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. त्यांना 2010 मध्ये अर्न्स्ट अँड यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इअर अवॉर्ड आणि 2013 मध्ये फोर्ब्स एशियातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सहभागी करण्यात आले आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.