AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅनकार्डच्या ‘या’ नियमात बदल

मुंबई : टॅक्स चोरी प्रकरणांवर आळा बसवण्यासाठी सरकारतर्फे पाच डिसेंबरपासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. या नवीन नियमांमध्ये आता 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त व्यापार करणाऱ्या संस्थाना पॅन कार्ड बनवणे अनिवार्य आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिलेल्या सूचनेनुसार जी संस्था 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करत असेल, त्यांना पुढच्यावर्षी 31 मेच्या आधी पॅन कार्डसाठी अर्ज […]

पॅनकार्डच्या 'या' नियमात बदल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

मुंबई : टॅक्स चोरी प्रकरणांवर आळा बसवण्यासाठी सरकारतर्फे पाच डिसेंबरपासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. या नवीन नियमांमध्ये आता 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त व्यापार करणाऱ्या संस्थाना पॅन कार्ड बनवणे अनिवार्य आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिलेल्या सूचनेनुसार जी संस्था 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करत असेल, त्यांना पुढच्यावर्षी 31 मेच्या आधी पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे.

जर त्यांनी पॅन कार्ड काढले नाही, तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. टॅक्स विभागाने पॅन कार्डच्या नियमामध्ये अजून एक मोठा बदल केला आहे. ज्या मुलांचे वडील हयात नसतील किंवा वेगळे राहत असतील अशा मुलांना पॅन कार्डवर वडिलांच्या नावाचा समावेश करणे बंधनकारक नसेल.

पॅन कार्डच्या नव्या नियमामुसार जर कुणी एका वर्षात 2.5 लाखांचा व्यवहार करत असेल, तर त्यांना 31 मे पर्यंत पॅन कार्ड बनवणे बंधनकारक असेल. इनकम टॅक्स विभागात नोकरी करत असणारे मॅनेजिंग डायरेक्टर, डायरेक्टर, पार्टनर, ट्रस्टी यांसारख्या अधिकाऱ्यांकडे पॅनकार्ड नसेल, तर त्यांनाही 31 मेच्या आधी पॅन कार्ड काढणे बंधनकारक आहे.

पॅन कार्डच्या या नवीन नियमामुळे टॅक्स चोरीवर आळा बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या देशात टॅक्स चोरी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सरकारला याचा फटका बसतो. याच कारणामुळे आयकर विभागाकडून  पॅन कार्डच्या नियमात बदल करण्यात आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.