Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Insurance : सरकारी विमा योजनांसाठी मोजा अधिक रक्कम, हप्त्यात झाली वाढ, तुमच्या खिशावर किती पडेल ताण?

Insurance : सरकारी विमा योजनांसाठी आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

Insurance : सरकारी विमा योजनांसाठी मोजा अधिक रक्कम, हप्त्यात झाली वाढ, तुमच्या खिशावर किती पडेल ताण?
विमा महागला Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 7:49 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana) आणि पीएम सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima) यापैकी तुम्ही एकाचा फायदा घेत असला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या लोककल्याणकारी योजनांचा प्रीमियम केंद्र सरकारने वाढविला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता या विमा योजनेच्या हप्त्यासाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे. त्याचा थोडाफार भार खिशावर पडणार आहे.

या योजनांचा हप्ता कमी आहे. त्यात सरकारने फार मोठी वाढ केलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्याचा या निर्णयाचा फार मोठा फटका बसणार नाही. परंतु, निर्णयानुसार अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. अर्थात त्याची फार मोठी झळ विमाधारकांना बसणार नाही.

केंद्र सरकारने या दोन्ही योजनांसाठीच्या हप्त्यात 1.25 रुपयांची वाढ केली आहे. या दोन्ही योजना जीवन सुरक्षेशीसंबंधित आहेत. या योजनेत अत्यंत कमी प्रीमियममध्ये तुम्ही 4 लाख रुपयांपर्यंतचा विमा घेऊ शकता. आता योजनेसाठी ग्राहकांना जादा रक्कम मोजावी लागेल.

हे सुद्धा वाचा

जर तुम्ही या दोन्ही योजनांचे लाभधारक असाल तर आता तुम्हाला अधिकचा प्रीमियम चुकता करावा लागणार आहे. पूर्वी या योजनेत संयुक्तपणे 342 रुपये वार्षिक द्यावे लागत होते, आता ही रक्कम वाढून 456 रुपये झाली आहे. या योजनेसाठी सरकारी बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना हा टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. या योजनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, वारसदाराला 2 लाख रुपये मिळतात. यामध्ये 18-50 वर्षाची कोणतीही व्यक्ती विमा खरेदी करु शकते. योजनेसाठी तुम्हाला 436 रुपये वार्षिक मोजावे लागतात. एका वर्षासाठी ही विमा योजना आहे.

या योजनेत विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास, तो अपंग झाल्यास त्याला 2 लाख रुपयांपर्यंतचा फायदा होतो. ही रक्कम वारसाला देण्यात येते. विमाधारक अपंग झाल्यास त्याला 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांचे वय कमीत कमी 18 वर्षे तर जास्तीत जास्त 70 वर्षे इतके आहे. या योजनेसाठी ठरलेल्या विमा हप्त्यात आता वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना फार मोठा फटका बसणार नसला तरी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.