AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्रेन संघर्षाचा परिणाम भारतावर, ग्रोथ रेट झाला कमी सोबतच निर्यात कमी होऊन महागाई देखील वाढेल

रशिया युक्रेन वादाचा परिणाम थेट भारतावर सुद्धा पाहायला मिळत आहे. ग्लोबल डाटाने भारताच्या ग्रोथ रेटला कमी केले आहे सोबतच निर्यात कमी करून महागाई वाढण्याची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या मुळे 2022 मध्ये भारताचा महागाई दर 5.5 टक्क्या पर्यंत पोहोचेल ,जो दर 2021 मध्ये 5.1 टक्के होता.

युक्रेन संघर्षाचा परिणाम भारतावर, ग्रोथ रेट झाला कमी सोबतच निर्यात कमी होऊन महागाई देखील वाढेल
growth rateImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 7:57 PM

मुंबईः ग्लोबलडाटा ने भारतीय अर्थव्यवस्थाचा (Indian Economy) आर्थिक विकास दर अंदाजे कमी करून 7.8 टक्के करण्यात आला. लंडन येथील माहिती विश्लेषण आणि सल्लागार कंपनी ने रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine crisis) यांच्यात सुरू असलेल्या भीषण युध्दाचा थेट परिणाम म्हणून तेलाच्या (Crude oil price) किंमतीत वाढ झाल्याचे कारण देत भारताच्या निर्यातीवर पडणाऱ्या परिणामाचा हवाला देत अर्थव्यवस्थेतील विकास दर कमी केला आहे. ग्लोबलडाटा ने शुक्रवारी एक निवेदन जाहीर केले. या निवेदनात म्हंटले गेले की, अमेरिका चलनाच्या तुलनेत रुपयाचे (Dollar vs Rupees) मूल्य दर कमी होण्याची शक्यता आहे म्हणूनच वस्तूंच्या किंमती वाढून महागाई देखील वाढेल त्याचबरोबर भारतीय बँक क्षेत्रात तेजी पाहायला मिळेल. निवेदनात असे म्हंटले आहे की, रशिया आणि विक्री यांच्या दरम्यान निर्माण झालेल्या लष्करी संकटामुळे भारतावरील निर्यातीवर त्याचा नकारात्मक परिणाम पाहायला मिळेल आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने गृह उपयोगी वस्तुच्या किंमती देखील वाढतील. कंपनीने सांगितले की, या सर्व कारणांकडे पाहता ग्लोबलडाटाने भारताची अर्थव्यवस्था विकास दर अंदाजाला 0.1 टक्के कमी करून 7.8 % केला आहे.

भारतात महागाई दर 2022 मध्ये 5.5 % असेल

तसे पाहायला गेले तर 2020 मध्ये भारताचे एकंदरीत आयातीमध्ये युक्रेन आणि रशिया यांचे संयुक्तरित्या 2.2 टक्के भागीदारी होती. ग्लोबल डाटा ने याशिवाय अंदाज लावला आहे की, रशिया आणि युक्रेन युद्धाद्वारे निर्माण झालेल्या भूराजकीय धोक्यामुळे 2022 मध्ये भारतात महागाई दर 5.5 टक्के पर्यंत पोहोचेल,जो दर 2021 मध्ये 5.1 टक्के होता.

रशिया आणि युक्रेन कडून भारत नेमकी किती आणि काय काय आयात करतो …

रिपोर्टनुसार, भारत आपल्या एकंदरीत गरजे नुसार 34 टक्के मिनरल फ्यूल, 14% सेमी प्रीसियस स्टोन, 10 टक्के फर्टिलाइजर, 5.6 टक्के पेट्रोलियम ऑयल आणि क्रूड फॅशन मधून आयात करतो.एनिमल आणि वेजिटेबल ऑईल चे जितक्या प्रमाणात आयात करतो त्याचे 75 टक्के, फर्टीलायझर चे 11 टक्के आणि इन ऑरगॅनिक केमिकलचे 3.5 टक्के युक्रेन मधून आयात करतो.

185 डॉलर पर्यंत पोहचू शकते कच्चे तेल

मॉर्गन स्टेनली यांच्या मते , जर भविष्यात रशियाकडून तेलाचा पुरवठा बद्दल जर अडचण आल्यास इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्चे तेल 185 डॉलरपर्यंत पोचू शकते गुरुवारी कच्चा तेलाची किंमत 120 डॉलर्स पर्यंत पोहोचली होती. रशिया विरुद्ध अमेरिका आणि युरोपमधील अन्य देश बंदी लावत आहेत, या कारणामुळे सुद्धा तेलाची निर्यात योग्यरित्या होत नाहीये. रशिया आता 66% तेलाचे निर्यात करू शकत नाहीये त्याचबरोबर 20 डॉलरचे डिस्काउंट ऑफर करत आहे परंतु हे विकत घेण्यासाठी खरीददार त्यांना मिळत नाहीये.

भविष्यात भारताचे इम्पोर्ट बिल वाढण्याची भीती..

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने भारताचे इम्पोर्ट मिळेल सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये 600 बिलियन डॉलर इतके असू शकते यामुळे महागाई आणि सुरू असलेल्या खात्यात कमी होण्याची उंची वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

गव्हाच्या भावात वाढ, जाणून घ्या गहू दरवाढीचे रशिया कनेक्शन

रशिया -युक्रेन युद्ध वाहन उद्योगाच्या मुळावर, देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा; फेब्रुवारीमध्ये वाहन विक्रीत घट

Russia Ukraine War : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ, सोने गेल्या 14 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.