Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rate Hike : टमाट्याने खाल्ला भाव, बटाट्याच्या वाकूल्या, भाज्यांमुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला..

Rate Hike : दिवाळीपासून भाजीपाल्यानेही सर्वसामन्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे. देशातील अनेक भागात भाव वाढले आहेत..

Rate Hike : टमाट्याने खाल्ला भाव, बटाट्याच्या वाकूल्या, भाज्यांमुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला..
दरवाढीचा फटकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 8:34 PM

नवी दिल्ली : बटाटे (Potato), टमाटे (Tomato) आणि कांदा हा स्वयंपाक घरातील रोजचा अत्यावश्यक घटक आहे. सध्या भाजीपाल्याच्या (Vegetable) किंमती वाढल्या आहेत. त्यात टमाटे, बटाटे आणि कांद्याच्या भाव वाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहे. त्यातच टमाट्याचे उत्पादन 4 टक्के आणि बटाट्याचे उत्पादन 5 टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने (Agriculture Department) व्यक्त केला.

यंदा, टमाट्याचे उत्पादन 2 कोटी 3 लाख टन राहण्याची शक्यता आहे. तर गेल्या वर्षी टमाट्याचे एकूण उत्पादन 2 कोटी 11 लाख होते. कृषी मंत्रालयाने फलोत्पादनाविषयीचे आकडे आणि अंदाज वर्तविल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

टमाट्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. दिवाळीपासूनच टमाट्याचे दर वाढायला सुरुवात झाली होती. सध्या टमाट्याचे भाव 80 रुपये किलो झाले आहेत. दिवाळीपर्यंत पावसाचे सावट होते. त्यामुळे टमाट्यांचे मोठे नुकसान झाले.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे टमाट्याचे उत्पादन घटले. तर दुसरीकडे सणांमुळे आणि उत्पादन घटल्याचा फटका ग्राहकांना बसला. टमाट्याचे भाव झपझप वाढले. एक किलो टमाट्यासाठी आता 80 रुपये मोजावे लागत आहेत. तर येत्या काही दिवसात दर वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकड्यानुसार, बटाट्याचे उत्पादनही घटणार आहे. 2021-22 दरम्यान बटाट्याच्या उत्पादनात 5 टक्क्यांची घसरण झाली होती. यंदा बटाट्याचे उत्पादन 5 कोटी 33 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी बटाट्याचे उत्पादन 5 कोटी 61 लाख टन झाले होते.

यंदा काद्याचे दर अचानक वाढले आहेत. पण काद्यांचे उत्पादन जास्त राहणार आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, देशात 3 कोटी टन काद्यांचे उत्पादन होईल. तर गेल्या वर्षी 2 कोटी 66 लाख टन काद्यांचे उत्पादन झाले होते.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.