Tomato Trouble : टोमॅटोच्या दरवाढीने महागाईला फुटला घाम, अर्थतज्ज्ञ म्हणतात हा उपाय कराच

Tomato Trouble : टोमॅटोच नाही तर इतर पण भाजीपालाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईचा विस्फोट झाल्याने अर्थतज्ज्ञांनी रिझर्व्ह बँकेला हा उपाय करण्याचे साकडे घातले आहे.

Tomato Trouble : टोमॅटोच्या दरवाढीने महागाईला फुटला घाम, अर्थतज्ज्ञ म्हणतात हा उपाय कराच
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 10:21 AM

नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : देशात महागाईला (Inflation) पालेभाज्यांनी घाम फोडला आहे. भाजीपाला महागल्याने महागाई निर्देशांकात वाढ झाली आहे. यापूर्वीच्या महिन्यात हा निर्देशांक खाली आला होता. ग्राहक किंमत निर्देशांकाने (Consumer Price Index-CPI) पण भरारी घेतली आहे. टोमॅटोच नाही तर अद्रक, बटाटे, भेंडी, मिरची आणि इतर भाज्या महागल्या आहेत. महागाईचा विस्फोट झाला आहे. आरबीआयने दोन वेळा रेपो दरात (RBI Repo Rate) कुठलाच बदल केलेला नाही. तो कमी केला नाही पण वाढवला ही नाही. तसा हा ग्राहकांना दिलासा नाही. कारण त्यांना आजही ईएमआयवर वाढीव व्याज भरावे लागत आहे. या सर्व परिस्थितीत देशातील अनेक अर्थतज्ज्ञांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाय सुचवला आहे. काय दिला त्यांनी सल्ला?

पतधोरण समितीची बैठक

आरबीआयच्या पतधोरण समितीची (RBI MPC Meeting ) ऑगस्ट महिन्यात बैठक होत आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 10 ऑगस्ट 2023 रोजी बैठक होईल. त्यात रेपो दराचा निर्णय होईल. जर या समितीने सध्याचा रेपो रेट कायम ठेवला तरी कर्जदारांना कुठलाही फायदा होणार नाही. त्यांच्या ईएमआयमध्ये कपात न झाल्याने दिलासा मिळणार नाही.

हे सुद्धा वाचा

भाजीपाला, धान्याचे दर वाढले

जून महिन्यात महागाईने उंच भरारी घेतली. टोमॅटोच्या किंमतीत 400 टक्क्यांची वाढ आली. अनेक ठिकाणी टोमॅटो 250 रुपयांवर पोहचला. खरीप पिकांवर मोठे संकट आले. मुसळधार पावसाने गणित बिघडवले. अद्रक, बटाटे, भेंडी, मिरची यांच्यासह इतर भाजीपाला महागला. त्यामुळे किचन बजेट विस्कळीत झाले.

तांदळाच्या किंमती वधारल्या

तांदळाच्या किंमतीत मोठी उसळी आली. केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाची निर्यात थांबवली. तुरदाळ आणि इतर दाळींनी डोके वर काढले आहे. किरकोळ बाजारात तुरदाळ 180 ते 200 रुपये प्रति किलोवर पोहचल्या आहेत. गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

रेपो दर सूसाट

व्याज दरात वाढ करण्याची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. एप्रिल आणि त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात वाढ झाली नाही.

अर्थतज्ज्ञांचा अंदाज काय

देशातील पतधोरण निश्चित करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, आरबीआय रेपो दरात कपात करण्याची स्थिती नाही. फूड बिलमध्ये वाढ झाली आहे. दाळी आणि भाजीपाला महागला आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत महागाईचा आकडा फुगण्याची शक्यता आहे. टोमॅटो, अद्रक, भोपळा, हिरवी मिरची, बटाट यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा हा फटका आहे. ही महागाई अस्थायी स्वरुपाची असल्याचा अर्थतज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे रेपो दरात लागलीच मोठ्या बदलाची शक्यता कमी आहे.

अर्थतज्ज्ञांचा सल्ला काय

महागाई निर्देशांकाची धावपळ पाहता, आरबीआय रेपो दरात कपात करणार नाही असा अर्थतज्ज्ञांना वाटते. केअरएजच्या मुख्य अर्थशास्त्री रजनी सिन्हा यांच्या मते रेपो दरात कपात होणार नाही. व्याजदरात पुढील वर्षात कपात होऊ शकते. अनेक अर्थतज्ज्ञांनी रेपो दरात वाढ न करता तो कायम ठेवण्याचा उपाय सुचवला आहे.

Non Stop LIVE Update
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका.