AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप्पाच्या आगमनादिवशीही प्रेमाचा खूनी खेळ, आणि त्यानं बघता बघता तिच्यासमोर डोक्यात गोळी घातली

त्या पीडीत मुलीचं लग्न होईल की नाही याबाबतच आता साशंकता आहे. पण ह्या सगळ्या प्रकरणात गावकरी मात्र मुलीच्या बाजूनं उभे आहेत. त्यांच्यानुसार साजन हा सरफिरा होता आणि त्याला अनेक वेळा समजवून सांगूनही तो ऐकत नव्हता.

बाप्पाच्या आगमनादिवशीही प्रेमाचा खूनी खेळ, आणि त्यानं बघता बघता तिच्यासमोर डोक्यात गोळी घातली
फक्त वीस रुपयांसाठी केला खून.
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 2:25 PM

सगळीकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे पण तरीही काहींच्या आयुष्यातलं प्रेमाचं विघ्न काही कमी होताना दिसत नाहीय. त्यातच हा प्रेमाचा ज्वर एवढा चढला की एकानं प्रेमाच्या लफड्यातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. मुलीनं मात्र ह्या सनकी आशिकवर आपलं कधीच प्रेम नव्हतं असं म्हटलंय. तो लग्नासाठी जिद्द करत होता आणि ऐकायलाच तयार नव्हता, त्यातच त्यानं असं टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. मुलाच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप केलाय तर खुद्द मुलीचे कुटुंबिय मात्र भीतीत आहेत. एकीकडे मुलीचा संसार सुरु होण्याआधीच उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर आणि मुलीवर गंभीर आरोप झालेत.

नेमकी घटना कशी घडली? ही घटना आहे बिहारमधल्या बेगुसरायची. बासुदेवपूर चंदपूरा गावात साजनकुमार महतो नावाचा तरुण रहात होता. तो शेजारीच रहाणाऱ्या मुलीवर प्रेम करत होता. साजनला त्या मुलीशी लग्न करायचं होतं. त्यासाठी त्यानं काही वेळेस तिला प्रपोजही केलं पण मुलीनं काही त्याला दाद दिली नाही. त्यातच त्या मुलीचं दुसरीकडे लग्न ठरलं. त्याचा राग साजनच्या डोक्यात गेला. तो तशाच संतापात मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरात गेला. मुलीला घेऊन तो घराच्या बाहेर आला. साजन मुलीवर संतापलेला होता. मुलगी त्याला समजून सांगत होती. पण वाद बोलता बोलता टोकाला गेला. त्यानं त्याच रागाच्या भरात स्वत: जवळचा देसी कट्टा काढला आणि त्यातून स्वत: डोक्यात डोळी घातली. एका क्षणात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. जाग्यावर त्याचा जीव गेला.

हत्या की आत्महत्या? साजनकुमारच्या घरच्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप मुलींच्या कुटूंबियांवर केलाय तर त्यानं आत्महत्याच केली असं पोलीसांच्या प्राथमिक रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलंय. ह्या सगळ्या प्रकरणामुळे ती मुलगी मात्र पीडीत ठरलीय. कारण साजनन आत्महत्या केल्यामुळे मुलीच्या होणाऱ्या सासरवाल्यांनी तिच्यावर आताच संशय घ्यायला सुरुवात केलीय. त्या पीडीत मुलीचं लग्न होईल की नाही याबाबतच आता साशंकता आहे. पण ह्या सगळ्या प्रकरणात गावकरी मात्र मुलीच्या बाजूनं उभे आहेत. त्यांच्यानुसार साजन हा सरफिरा होता आणि त्याला अनेक वेळा समजवून सांगूनही तो ऐकत नव्हता. त्यामुळे त्यानं जे टोकाचं पाऊल उचललं त्याचा फटका मुलीच्या आयुष्याला नको.

विशेष म्हणजे बेगुसरायमध्येच 26 ऑगस्टला एका मुलगा बेपत्ता झाला. नंतर त्याचा मृतदेह पाटना जिल्ह्यातल्या मोकामा टाल भागात सापडला. त्याचं नाव ऋतूराजकुमार होतं. तो शाळेत शिकायचा. नेहमीप्रमाणं तो घराच्याबाहेर पडला आणि परतलाच नाही. तो ज्या सायकलवर जायचा तीही मिळाली नाही. नंतर त्याचं अपह्रण झालं असावं अशी शंका व्यक्त केली गेली. ती खरी ठरली. ऋतूराजचं अपह्रण करुन खून करण्यात आला. बेगुसरायमध्ये घडलेल्या ह्या लागोपाठच्या दोन घटनांनी दहशत निर्माण झालीय.

  PI संजय निकम यांची दादागिरी, लालबागच्या दरबारात म्हणतात, हात काय, पाय सुद्धा लावून दाखवतो!

केतकी चितळेला ‘ती’ पोस्ट आणखी भोवणार! ठाणे कोर्टाकडून अभिनेत्रीचा अटकपूर्व जामीन नामंजूर, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Gold Price Today: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनं स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.