AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने पैसे कट झाले, माथेफिरु ग्राहकाने बँक मॅनेजरला चाकूने भोसकले !

बँकेच्या नियमानुसार सेव्हिंग खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे अनिवार्य आहे. मात्र चिंटू उर्फ फिरोज नामक ग्राहकाच्या खात्यात मिनिमम बॅलन्सही नसल्याने बँकेने चार्ज लावला.

खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने पैसे कट झाले, माथेफिरु ग्राहकाने बँक मॅनेजरला चाकूने भोसकले !
घरगुती जमिनीचा वादImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 06, 2023 | 8:38 PM
Share

रांची : बँक खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्याने पैसे कट झाले म्हणून संतापलेल्या माथेफिरु ग्राहकाने बँक मॅनेजरवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना रांचीत घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बँकेत एकच गोंधळ उडाला. हल्ला केल्यानंतर आरोपी ग्राहक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्याने पैसे कट झाले

रांचीतील कांटा टोली येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत ही धक्कादायक घटना घडली आहे. बँकेच्या नियमानुसार सेव्हिंग खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे अनिवार्य आहे. मात्र चिंटू उर्फ फिरोज नामक ग्राहकाच्या खात्यात मिनिमम बॅलन्सही नसल्याने बँकेने चार्ज लावला.

आरोपी दररोज बँकेत वाद घालायचा

यामुळे फिरोज संतापला आणि दररोज बँकेत येऊन वाद घालायचा. जवळपास सहा महिने त्याचा बँकेत येऊन गोंधळ सुरु होता. शुक्रवारी फिरोज पुन्हा बँकेत आला आणि थेट मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. यानंतर त्याने बँकेच्या नियमांबाबत मॅनेजरशी वाद करण्यास सुरुवात केली.

वाद विकोपाला गेला अन् आरोपीने थेट चाकूहल्लाच केला

वाद इतका वाढला की फिरोजने स्वतःजवळील चाकू काढला आणि मॅनेजरवर हल्लाबोल केला. फिरोजने चाकूने मॅनेजरवर अनेक वार केले. या हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे.

बँकेत उपस्थित ग्राहक आणि इतर कर्मचाऱ्यांना काही कळायच्या आत फिरोज मॅनेजरवर वार करुन पळून गेला. जखमी मॅनेजरला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.