AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद शहर पोलिसातील 560 कर्मचाऱ्यांची बदली, पीएसआय ते आयुक्त सर्वांचा नंबर लागणार?

गृह मंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालयातून पोलीस आयुक्तांपासून ते अधीक्षक, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांचीही बदली होणार आहे.

औरंगाबाद शहर पोलिसातील 560 कर्मचाऱ्यांची बदली, पीएसआय ते आयुक्त सर्वांचा नंबर लागणार?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 11:47 AM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद शहर पोलीस दलातील 560 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. हवालदार ते सहायक फौजदार पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदली करण्यास सुरुवात झाली आहे. पसंतीक्रम दिलेल्या तीन ठिकाणांपैकी एका जागी त्यांची बदली केली जात आहे. पीएसआयपासून पोलीस आयुक्तांपर्यंत सर्वांचा नंबर लागणार असल्याची माहिती आहे.

औरंगाबाद शहर पोलीस दलातील 809 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 560 जणांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, तर उर्वरित कर्मचाऱ्यांचे बदली आदेश आज निघणार आहेत. शहर पोलीस दलातील हवालदार ते सहाय्यक फौजदारांच्या बदली करण्यास सुरुवात झाली आहे. तीन पसंतीच्या ठिकाणांपैकी एका जागी त्यांची बदली केली जात आहे.

कोणाकोणाची बदली होणार?

गृह मंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालयातून पोलीस आयुक्तांपासून ते अधीक्षक, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांचीही बदली होणार आहे.

मुंबईतील अधिकाऱ्यांच्या बदलीला ब्रेक

दुसरीकडे, आठ वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीला ब्रेक लागला आहे. कोव्हिड प्रादुर्भाव, पालिका निवडणुका आणि सण समारंभ यांच्या पार्श्वभूमीवर बदलींचे आदेश सहा महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहेत. जून महिन्याच्या अखेरीस बदलींसाठी मुंबईतील 727 अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती.

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात पोलिस खात्याची बदनामी झाल्यानतंर आठ वर्षांहून अधिक कालावधी मुंबई शहरात काढणाऱ्या पोलिसांची आंतरजिल्हा बदली करण्यात येणार होती. मात्र शहरातील पोलिस दलात असलेली रिक्त पदे, कोव्हिड19 चा प्रादुर्भाव, सण, महापालिका निवडणुका, गणपती, नवरात्र या पार्श्वभूमीवर पोलिस आस्थापन मंडळाच्या बैठकीत या आदेशावर सहा महिन्यानंतर कारवाई करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.

कोणाची होणार होती बदली?

शहरामध्ये आठ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांची मुंबईबाहेर बदली होणार होती. त्यात नवी मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या शहरांचा समावेश होता. मुंबई पोलिसातील संबंधित 727 अधिकाऱ्यांना मुंबई शहराबाहेरील आपल्या पसंतीच्या तीन जागा निवडण्याचे आदेश देण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

मुंबईतील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला सहा महिन्यांचा ब्रेक, कारण…

आठ वर्ष मुंबईतच पोस्टिंग, बड्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली होणार, 727 जणांची यादीही तयार

(Aurangabad City Police officers transfer order)

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.