AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : विमान दुर्घटनेत ठाण्यातील अख्ख कुटुंब संपलं! 2 महिन्यांनी कळलं, मृत वैभवीच्या अकाऊंटमधून 15 लाखांची अफरातफर

वय वर्ष 50 असलेल्या वैभवी त्रिपाठी यांचा विमानात अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडील सर्वच गोष्टी हरवल्या असाव्यात, असं कुटुंबीयांना वाटलं होतं.

Thane Crime : विमान दुर्घटनेत ठाण्यातील अख्ख कुटुंब संपलं! 2 महिन्यांनी कळलं, मृत वैभवीच्या अकाऊंटमधून 15 लाखांची अफरातफर
सायबर गुन्हेगारीत वाढImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 07, 2022 | 8:33 AM
Share

मुंबई : नेपाळमध्ये (Nepal) सुट्टीसाठी गेलेल्या कुटुंबाचा विमान दुर्घटनेत (Plane Crash) मृत्यू झाला. तारा एअर क्रॅशमध्ये ठाण्यातील एकाच कुटुंबामधील चौघे ठार झाले होते. मे महिन्यात घडलेल्या या दुर्घटनेच्या दोन महिन्यांनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बँक अकाऊंटमधून (Bank Crime News) लाखो रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. थोडे थोडके नाही, तर तब्बल 14.6 लाख रुपये काढण्यात आले असून मृत व्यक्तीच्याच नावे कर्ज काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. हा सगळा सायबर क्राईमचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून आता पोलिसांकडून या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपास केला जातो आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बहिणीने याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंद केली असून पुढीत तपास केला जातोय. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.

नेमकं काय प्रकरण?

त्रिपाठी कुटुंबीय मे महिन्यामध्ये फिरण्यासाठी म्हणून नेपाळ टूरवर गेले होते. त्यावेळी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या वैभवी त्रिपाठी, अशोक कुमार, त्यांची दोन मुलं धनुष आणि रितिका यांचाही या अपघातात जीव गेला होता. या अपघातातून काही बँगा आणि लॅपटॉप सापडला होता. पण यात वैभवी यांच्या फोन बाबत आणि बँक अकाऊंट, बँकेचे कार्ड याच्याबाबत तेव्हा माहिती देण्यात आलेली नव्हती. दरण्यान, आता समोर समोर आलेल्या माहितीनुसार मृ्त्यू झालेल्या वैभवी यांच्या अकाऊंटमधून तब्बल 40 ट्रान्सझॅक्शन्स करण्यात आली आलीत. 13 जून ते 30 जुलै दरम्यान, हा प्रकार घडल्याचंही उघडकीस आलं असून पवई पोलिसांत याप्रकरणी मृत वैभवीच्या बहिणीनं तक्रार दिली आहे.

कळलं कसं?

वय वर्ष 50 असलेल्या वैभवी त्रिपाठी यांचा विमानात अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडील सर्वच गोष्टी हरवल्या असाव्यात, असं कुटुंबीयांना वाटलं होतं. कायदेशीर वारस असल्यामुळे वैभवीच्या बहिणीने वैभवीचं सीम कार्ड आपल्या नावावर करुन घेतलं. त्यानंतर जेव्हा हे सीम कार्ड एक्टीवेट करण्यात आलं, त्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. वैभवी यांच्या अकाऊंटवरुन गेल्या दीड महिन्यात पैशांचे व्यवहार झाल्याचं एसएमएसमधून उघड झालं. 30 जुलै रोजी हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर मृत वैभवीच्या बहिणीला आणि तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.

तपास सुरु

दरम्यान, आता यापर्यंत जवळपास पंधरा लाख रुपयांची अफरातफर झाली असून पाच लाख रुपयांचं कर्जही याच अकाऊंटवरुन काढलं गेलं असण्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. याप्रकरणी आता पोलिसांत तक्रार देण्यात आली असून सायबर पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वैभवी यांच्या अकाऊंटमधून पैसै ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर हे पैसे वेगवेगळ्या एटीएममधून विड्रॉ केले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एक प्रकारचे रॅकेटच यामागे असावं, असा संशय पोलिसांना असून या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.