आधी महिलेचे डोळे बाहेर काढले, मग जीभ आणि प्रायव्हेट पार्ट कापला, असं काय घडलं की क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या !

जमिनीवरुन शेजाऱ्यांमध्ये वाद होता. हाच वाद उफाळून आला आणि शेजाऱ्यांनी महिलेसोबत जे केले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

आधी महिलेचे डोळे बाहेर काढले, मग जीभ आणि प्रायव्हेट पार्ट कापला, असं काय घडलं की क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या !
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 4:45 PM

खगडिया : बिहारमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून एका महिलेसोबत क्रूर कृत्य करत तिची हत्या करण्यात आली आहे. चौघांनी 45 वर्षीय सुलेखा देवीला जबर मारहाण केली. मग चाकूने तिचे डोळे काढले. त्यानंतर जीभ आणि प्रायव्हेट पार्टही कापला. यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. पसराया पोलीस ठाण्याअंतर्गत बहियार गावात ही घटना घडली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अन्य तीन आरोपी फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे 9 वर्षांपूर्वी या आरोपींनी महिलेचा पती आणि दिराची हत्या केली होती. एक आरोपी नुकताच जामिनावर बाहेर आला होता.

काय आहे प्रकरण?

पीडित महिलेचा शेजाऱ्यांसोबत 5 एकर जमिनीवरुन वाद सुरु होता. याच वादातून आरोपींनी हे क्रूर हत्याकांड घडवले. पीडित महिला शेतात कामावर गेली असताना आरोपी तेथे गेले. त्यांनी महिलेला बेदम मारहाण केली. मग चाकूने तिचे डोळे बाहेर काढले. मग तिची जीभ आणि प्रायव्हेट पार्ट कापला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. 25 एप्रिल 2014 मध्ये महिलेचा पती बबलू सिंह आणि लहान दिराचीही आरोपींनी हत्या केली होती.

नातेवाईकांकडून चक्का जाम

या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ माजली आहे. महिलेच्या हत्येमुळे संतप्त नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केला. अनेक तास महामार्गावर चक्का जाम झाल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. गोगरीचे एसडीपीओ मनोज कुमार यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. आरोपींना लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासनही दिले. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरुन गुन्ह्यात वापरलेला चाकूही हस्तगत केला आहे.

हे सुद्धा वाचा

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.