AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाला दोन महिने झाले तरी पत्नी सासरी येईना, अखेर हताश पतीने उचललं हे टोकाचं पाऊल

लग्न थाटामाटात पार पडले. लग्नानंतरच्या सर्व विधी झाल्या. पण नववधूची माहेरचे लोक पाठवणीच करत नव्हते. अखेर नवरदेव हताश झाला.

लग्नाला दोन महिने झाले तरी पत्नी सासरी येईना, अखेर हताश पतीने उचललं हे टोकाचं पाऊल
लग्नमंडपात वीजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
| Updated on: Jun 14, 2023 | 5:17 PM
Share

आरा : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर माहेरचे रीतीरिवाज पार पाडण्यासाठी मुलगी वधू माहेरीच राहत होती. लग्नाला दोन महिने झाले तरी सासरवाडीतले लोक मुलीची पाठवणी करत नव्हते. अखेर तरुण हताश झाला आणि त्याने आपले जीवन संपवले. कृष्ण कुमार असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

लग्नानंतरचे रीतीरिवाज पार पाडण्यासाठी पत्नी राहत होती

कृष्ण कुमारचा 14 एप्रिल रोजी एकवारी गावातील रीमा कुमारीसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर माहेरचे काही रीतीरिवाज पार पाडण्यासाठी मुलगी काही दिवस माहेरी राहिल अशी बोलणीच लग्नाआधी झाली होती. त्यानुसार सासरच्यांनी वधूला तिच्या माहेरी ठेवले. यानंतर मयत तरुण मुंबईत भाजीचा धंदा करत असल्याने सर्वजण मुंबईला परतले. मात्र रीतीरिवाजाच्या नावाखाली दोन महिने झाले तरी नवरी सासरी परतली नाही. यामुळे कृष्ण कुमार गावी गेला.

पत्नी घरी येत नसल्याने नैराश्येतून टोकाचे पाऊल

कृष्ण कुमार 4 जूनला पत्नीला आणण्यासाठी गावी गेला. त्यानंतर त्याने वडिलांना आपण सासरवाडीत पत्नीला आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर थेट त्याच्या मृत्यूचीच बातमी आली. कृष्ण कुमारने आत्महत्या करण्यापूर्वी बहिणीला फोन करुन माहिती दिली. बहिणीने त्याच्या सासरवाडीत याबाबत माहिती दिली. सासरवाडीतल्या लोकांनी तात्काळ कृष्ण कुमारच्या घरी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेश शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलील पुढील तपास करत आहेत. पत्नी सासरी नांदायला येत नव्हती. यामुळे तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.