उधारीचे 20 रुपये मागितल्याने तरुणाला संताप अनावर झाला, मग जे घडलं त्याने सारा गाव हादरला !

उधारीचे 20 रुपये मागितले म्हणून तरुणाला राग आला. मग चाट विकणारा तरुण आणि आरोपीमध्ये जरोदार वाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे उघडकीस आलं त्याने सर्वच हादरले.

उधारीचे 20 रुपये मागितल्याने तरुणाला संताप अनावर झाला, मग जे घडलं त्याने सारा गाव हादरला !
उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणातून तरुणाला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 1:48 PM

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उधारीचे 20 रुपये मागितले म्हणून चाट विकणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ फेकला. धनराज असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृतदेहावर मारहाणीच्या खुणाही आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

उधारीचे पैसे मागितले म्हणून धमकावले

धनराजचा गावात चाटचा स्टॉल होता. गावातील अशोक यादव या तरुणाने पाच दिवसापूर्वी धनराजकडे 20 रुपयांचा चाट उधारीवर खाल्ला होता. अशोकने पैसे न दिल्याने धनराजने काल त्याच्याकडे उधारीचे पैसे मागितले. यावरुन अशोक संतापला आणि धनराजला शिवीगाळ करु लागला. पाहता पाहता वाद वाढत गेला आणि मारामारी झाली. यावेळी गावातील लोकांनी मध्यस्थी करुन दोघांचे भांडण सोडवले. यानंतर अशोक धनराजला बघून घेऊन अशी धमकी देऊन निघून गेला.

सामान आणायला गेला तो परतलाच नाही

दुसऱ्या दिवशी सकाळी धनराज धंद्याचे सामान आणण्यासाठी घरुन गेला तो परतलाच नाही. रात्र झाली तरी धनराज परत न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरु केला. दुसरीकडे जीआरपी पोलिसांना रेल्वे ट्रॅकजवळ धनरजाचा मृतदेह मिळाला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शिवरामपूर पोलिसांकडे सुपूर्द केला. धनराजच्या कुटुंबीयांनी अशोक यादव याच्यावर हत्येचा आरोप केला आहे. पोलीस सर्व घटनेचा सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.