AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसरीही मुलगीच झाली, नाराज पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

मय विवाहिता राजनंदिनी सरनोबत हिला दोन मुली आहेत. पहिली मुलगी अडीच वर्षाची तर दुसरी मुलगी सहा महिन्यांची आहे.

दुसरीही मुलगीच झाली, नाराज पतीने उचलले 'हे' टोकाचे पाऊल
दोन्ही मुलीच झाल्याच्या रागातून पतीनेउचलले टोकाचे पाऊलImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 6:10 PM
Share

सांगली : दुसरीही मुलगी (Girl)च झाल्याच्या रागातून नाराज पतीने पत्नी (Wife)ला संपवल्याची धक्कादाक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे उघडकीस आली आहे. कौस्तुभ कृष्णराव सरनोबत असे या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

विवाहितेला दोन मुली

सांगलीच्या इस्लामपूर येथे कोळी मळा परिसरात सरनोबत कुटुंबीय राहतात. मयत विवाहिता राजनंदिनी सरनोबत हिला दोन मुली आहेत. पहिली मुलगी अडीच वर्षाची तर दुसरी मुलगी सहा महिन्यांची आहे.

दोन्ही मुलीच झाल्याने पती नाराज

कौस्तुभला मुलगा हवा होता. मात्र दोन्ही मुलीच झाल्याने राजनंदिनीचा पती कौस्तुभ हा नाराज होता. याच रागातून तो पत्नी राजनंदिनीला मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने रविवारी पहाटे बाईकवरुन घेऊन गेला.

नाराजीतून पत्नीला विहिरीत ढकलले

कापूसखेड गावच्या हद्दीत असलेल्या मुख्य रस्त्याजवळ असलेल्या एका शेताजवळ बाईक थांबवली आणि तेथेच असलेल्या विहिरीत पत्नीला ढकलून दिले. पत्नीला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला.

घातपात करुन अपघाताचा बनाव

पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कौस्तुभने इस्लामपूर पोलिसात पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. विहिरीजवळ लघुशंकेसाठी गेली असताना पत्नी पाय घसरुन पडली आणि त्याच तिचा मृत्यू झाल्याचे कौस्तुभने पोलिसांना सांगितले.

माहेरच्यांच्या मागणीमुळे पोलीस चौकशीत घातपात उघड

मात्र राजनंदिनीच्या माहेरच्या लोकांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली. तसेच पोलिसांनी याबाबत चौकशी करावी अशी मागणी उचलून धरली.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

आरोपी पती अटक

यानंतर राजनंदिनी यांचे नातेवाईक मिलिंद सावंत यांच्या फिर्यादीवरुन इस्लामपूर पोलिसांनी कौस्तुभ सरनोबत याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.