AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला शिवीगाळ, औरंगाबादेत चाललंय काय?

औरंगाबाद मुकुंदवाडी भागात हा प्रकार घडला. या परिसरात वेगवेगळ्या गल्लीत कारवाई करीत असतानाच दोघांनी महावितरणच्या पथकावर दगड भिरकावले आणि हुसकावून लावले, अशी तक्रार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

Aurangabad: वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला शिवीगाळ, औरंगाबादेत चाललंय काय?
मुकुंदावाडी परिसरात महावितरणच्या पथकाला धुक्काबुक्की झाल्याचा आरोप
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 2:27 PM
Share

औरंगाबादः शहरात धक्कादायक घटना घडलीय. थकीत वीजबील वसुलीस गेलेल्या महावितरणच्या पथकाला शिवीगाळ, दमदाटी करीत पळवून लावल्याची घटना घडलीय. शिवाय या पथकावर दगड भिरकावल्याचेही पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र महिनोंमहिने वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांकडून वसुली करण्यासाठी जाणाऱ्या पथकाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

मुकुंदवाडी परिसरात घडला प्रकार

औरंगाबाद मुकुंदवाडी भागात हा प्रकार घडला. या परिसरात वेगवेगळ्या गल्लीत कारवाई करीत असतानाच दोघांनी महावितरणच्या पथकावर दगड भिरकावले आणि हुसकावून लावले, अशी तक्रार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यावरून मुकुंदवाडी ठाण्यात अशोक भातकुडे आणि रामेश्वर निकाळजे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महावितरणचे चिकलठाणा विभागाचे सहाय्यक अभियंता विजय गणेश काथार हे 11 जानेवारीला आपला कर्मचाऱ्यांसोबत तीन पथक करुन संयजनगरात कारवाईसाठी गेले. त्यावेळी गल्ली क्र. 15 मध्ये कारवाई करीत असताना आरोपी रामेश्वर निकाळजे आणि अशोक भातकुडे त्यांच्याकडे गेले. त्यांनी लगेचच येथून निघून जा नसता गल्लीतून बाहेर पडू देणार नाही, अशी धमकी देत दगड घेऊन त्यांच्यावर भिरकावले. ते बाहेर पडताच आरोपंनी शाम मोरे यांच्या पथकाकडे मोर्चा वळविला. त्यांना गल्ली क्र 14 मधून हुसकावले. त्यानंतर आरोपी काथार यांच्या पथकाकडे गल्ली क्र. 21 मध्ये गेले. त्यांना धक्काबुक्की करुन मीटर जप्ती करण्यापासून रोखले. तसेच, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

इतर बातम्या-

Winter Digestion: हिवाळ्यात पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

Neelam Gorh |’मुख्यमंत्री ऑन फिल्डच; ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीये त्याला काय करावं- नीलम गोऱ्हे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.