AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले

मातीपासून सोनं बनवणं, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? खरंतर पोलिसांसाठी देखील हे प्रकरण कदाचित नवीनच होतं. त्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावले.

गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले
गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 6:48 PM

मुंबई : मातीपासून सोनं बनवणं, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? खरंतर पोलिसांसाठी देखील हे प्रकरण कदाचित नवीनच होतं. त्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावले. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या माहितीतून चोर पैसे कमविण्यासाठी काय शक्कल लढवितात या विचाराने तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मातीपासून सोने बनवण्याचा दावा करणाऱ्या टोळीला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैला कांदिवली पोलीस ठाण्यात इको कारच्या सायलेन्सर चोरीची घटना घडली होती. जेव्हा पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला, तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी फक्त इको कारचे सायलेन्सर चोरतात आणि प्रथम सायलेन्सरच्या आतून माती काढतात. नंतर प्लॅटिनम तयार करण्यासाठी ती माती वितळवतात. त्यानंतर त्या प्लॅटिनममधून सफेद सोने म्हणजेच व्हाईट गोल्ड तयार करतात. एक इकोच्या सायलेन्सरमधून जवळपास एक किलो माती बाहेर येते, ज्याची बाजारात किंमत 75 हजार आहे, पण हे लोक माती फक्त 25 ते 30 हजारात विकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तीन चोरांना बेड्या

याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुश्ताक गुल मोहम्मद शेख, सद्दाम हुसेन मोहम्मद शरीफ मनिहार आणि सुजित यादव अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व कांदिवली आणि मालाड-मालवणीचे रहिवासी आहेत. ते गॅरेज लाईनशी जोडलेले आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

मुंबईत 40 पेक्षा जास्त वाहनांच्या चोऱ्या

आतापर्यंत 9 सायलेन्सर चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी दोन गुन्हे कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. चोरांनी संपूर्ण मुंबईत 40 हून अधिक वाहनांचे सायलेन्सर चोरले आहेत. ही टोळी संपूर्ण भारतात सक्रिय आहे. आणि आणखी काही लोक यामध्ये सामील आहेत, ज्याची पोलीस चौकशी करत आहेत.

हेही वाचा :

स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात, अतिउत्साही तरुणांचा कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी

अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सर्व मागण्या फेटाळल्या, शेवटचा पर्यायही संपला?

20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.