AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परराज्यातून टोळी यायची, नागपुरात मोबाईल चोरायची, या देशात नेऊन विक्री…

आता ती मोबाईल चोरट्यांची टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. या माहितीवरून पोलिसांनी यांचा शोध घेतला. ही टोळी ऑटोमोटिव्ह चौक परिसरात एक किरायाची खोली घेऊन राहत होती. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

परराज्यातून टोळी यायची, नागपुरात मोबाईल चोरायची, या देशात नेऊन विक्री...
परराज्यातील मोबाईल चोरटे जेरबंद
| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 10:19 PM
Share

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मोबाईल चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी झारखंड -बिहारमधून येऊन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करायची. चोरी केलेले मोबाईल बांगलादेशमध्ये विकायचे. या टोळीकडून 16 लाख रुपये किमतीचे 72 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागपुरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. गुन्हे शाखा पोलिसांनी मोबाईल चोरट्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, एक टोळी नागपुरात मोबाईल चोरीसाठी सक्रिय झाली आहे. ती वेगवेगळ्या राज्यात जाऊन मोबाईलची चोरी करते.

किरायाच्या खोलीत छापा

आता ती मोबाईल चोरट्यांची टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. या माहितीवरून पोलिसांनी यांचा शोध घेतला. ही टोळी ऑटोमोटिव्ह चौक परिसरात एक किरायाची खोली घेऊन राहत होती. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. खोलीची झडती घेतली असता वेगवेगळ्या कंपनीचे 72 मोबाईल या ठिकाणी सापडले. या मोबाईलची किंमत 16 लाखांच्या घरात आहे. यामध्ये आणखीसुद्धा आरोपी असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक किशोर परबते यांनी दिली.

गर्दीच्या ठिकाणी चोरायचे मोबाईल

बिहारमधून निघून ही टोळी एक एक शहर गाठत होती. गर्दीचे ठिकाण शोधत होती. मोबाईल चोरीसाठी सावज हेरत होती. लहान मुलांच्या माध्यमातून त्या मोबाईलची चोरी करायची. लगेच दुसऱ्याकडे मोबाईल पास करत होती. त्या ठिकाणाहून पळ काढत.

अशाप्रकारे यांनी अनेक चोऱ्या केल्यात. हे सगळे मोबाईल झारखंड आणि बिहारमार्गे बांगलादेशमध्ये जात होते. तिथं कमी दरात विक्री करण्यात येत होती. त्यामुळे या टोळीचे मुळं कुठपर्यंत आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.