AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरिबांचे हक्काचे रेशन व्यापाऱ्यांच्या दुकानात; सरकारने दिलेल्या धान्याची लूट

गरिबांच्या हक्काचे चार हजार किलो तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी जाताना पकडण्यात पोलिसांना यश आलं. अशी माहिती कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली.

गरिबांचे हक्काचे रेशन व्यापाऱ्यांच्या दुकानात; सरकारने दिलेल्या धान्याची लूट
| Edited By: | Updated on: Feb 24, 2023 | 5:36 PM
Share

नागपूर : गरीब माणसाला सरकारकडून स्वस्त दरात मिळते. या तांदळाची काळाबाजारी करून मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक प्रयत्न फसला. कळमना पोलीस स्टेशन हद्दीत चिखली रोडवर एक बोलेरो पिकअप गाडी बंद पडली. त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याची चौकशी केली. गाडीमध्ये तांदूळ असल्याचं पुढं आलं. यावरून पोलिसांनी वाहन चालकाला बिल संबंधित विचारणा केली. त्यांच्याकडे कुठलेही बिल नव्हतं. हे गोडाऊनमधून भरून मार्केटमध्ये नेत असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांच्या तपासात हा तांदूळ सरकारी धान्य दुकानातील असल्याचं पुढे आलं. पोलिसांनी गोडाऊनवरसुद्धा जाऊन तपासणी केली. मात्र त्या ठिकाणी आणखी धान्य मिळून आलं नाही.

अशी होते काळाबाजारी

गरिबांना अन्न हवं म्हणून सरकार रेशनचं धान्य देते. पण, ते धान्य गरिबांना पूर्णपणे मिळत नाही. काही दुकानदार अर्धवट रेशनचं धान्य देऊन गरिबांची बोळवण करतात. याची तक्रार अन्न पुरवठाविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केल्यास तेही फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. रेशन दुकानदार बदलवून टाका असा सल्ला देतात. त्यामुळं रेशन दुकानदारांचे चांगलेच फावते. काही रेशन दुकानदार रेशनचे चांगले धान्य बाजारात व्यापाऱ्यांना विकतात. व्यापारी राईस मिलमध्ये माल पोहचवतात. राईस मिलमध्ये त्या तांदळाला बारीककरून पुन्हा बाजारात आणले जाते. असे हे चक्र नागपूर जिल्ह्यात सुरू आहे. या प्रकरणी चौकशी केल्यास मोठं घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.

चार हजार किलो तांदूळ बाजारात

अशाप्रकारे गरिबांच्या हक्काचे चार हजार किलो तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी जाताना पकडण्यात पोलिसांना यश आलं. ४० क्विटल धान्य जप्त करण्यात आले. अशी माहिती कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली. रेशन दुकानात येणाऱ्या धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर आळा घालण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. यातून सामान्य माणसाचा हक्क मारला जातो हे मात्र नक्की. अन्न पुरवठा विभागानं पोलिसांसोबत चौकशी केल्यास फार मोठं घबाड बाहेर येईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.