AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kasara Accident : दैव बलवत्तर म्हणून…कसारा घाटात भीषण अपघात, 40 मिनिटांनी चालकाची सुखरुप सुटका

रविंद्र सिंग आणि अमित कुमार शुक्ला हे दोघे कंटनेर घेऊन नाशिकहून मुंबईकडे सकाळी चालले होते. नवीन कसारा घाटात कंटेनर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि लतिफवाडीच्या वळणावर कंटनेर पलटी झाला. चालक आणि क्लिनर कंटेनरमध्ये अडकले होते.

Kasara Accident : दैव बलवत्तर म्हणून...कसारा घाटात भीषण अपघात, 40 मिनिटांनी चालकाची सुखरुप सुटका
कसारा घाटात भीषण अपघातImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 12:13 AM
Share

कसारा : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोला भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना नवीन कसारा घाटात रविवारी सकाळी घडली आहे. सदर कंटेनर नाशिकहून मुंबईला जात होता. लतिफवाडीच्या वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण (Control) सुटले आणि कंटेनर (Container) पलटी झाला. विशेष म्हणजे दैव बलवत्तर म्हणून एवढा भीषण अपघात होऊनही चालक आणि क्लिनर दोघेही सुखरुप बचावले. तब्बल 40 मिनिटांनी कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाची सुखरुप सुटका करण्यात आली. चालकाच्या पायला गंभीर जखम झाली असून क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. रविंद्र सिंग असे चालकाचे तर अमित कुमार शुक्ला असे क्लिनरचे नाव आहे.

आपत्ती व्यवस्थापनने शर्थीचे प्रयत्न करुन चालकाला बाहेर काढले

रविंद्र सिंग आणि अमित कुमार शुक्ला हे दोघे कंटनेर घेऊन नाशिकहून मुंबईकडे सकाळी चालले होते. नवीन कसारा घाटात कंटेनर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि लतिफवाडीच्या वळणावर कंटनेर पलटी झाला. चालक आणि क्लिनर कंटेनरमध्ये अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच कसारा घाट महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमशी संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन टीमही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनने 40 मिनिटे शर्थीचे प्रयत्न करत जखमी चालकाला बाहेर काढले. चालकाला उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Serious accident to container in Kasara Ghat, safe rescue of driver after 40 minutes)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.