AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे विधात्या इतका निष्ठूर का झालास? 3 कोवळ्या मुलींसह आईचंही आयुष्य नियतीनं हिरावलं

जत तालुक्यातील एका गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय.

हे विधात्या इतका निष्ठूर का झालास? 3 कोवळ्या मुलींसह आईचंही आयुष्य नियतीनं हिरावलं
तीन लेकींसह आईही तलावात बुडालीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 10, 2022 | 2:46 PM
Share

शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : सांगली जिल्ह्यात एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आलीय. तीन लेकींसह आईचाही तलावात बुडून मृत्यू (Mother Daughter drown) झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. तलावातील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सांगली (Sangli Drowned News) जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला. ज्या तलावाजवळ धुण्याचे कपडे आणि साबण आढळून आला, त्याच तलावात तीन मुली आणि एका महिलेचा मृतदेह (Dead Body) तरंगत असल्याचं पाहून सगळेच हादरले.

समोर आलेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील बिळूर गावातील तलावात 4 जणांचा बुडून मृत्यू झाला. तलावात पडून चारही जण मृत्यूमुखी पडले. या सर्व मृतदेहांची ओळखही पटली असून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

जतमधील ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहांची तपासणी केली जाते आहे. तसंच स्थानिक पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.मृत्यू झालेल्यांची नावं सुनिता माळी, अमृता माळी, अश्विनी माळी आणि ऐश्वर्या माळी अशी आहेत.

मृत सुनिता माळी ही तलावात आढळलेलेल्या अन्य लहान मुलींची आई आहे, अशी माहिती समोर आलीय. सुनिता आणि तिच्या मुली पाण्यात नेमक्या कशामुळे बुडाल्या, याचं गूढही वाढलंय.

प्राथमिक माहितीनुसार, सुनिता माळी यांच्या घराजवळ एक तलाव आहे. या तलावाजवळ कपडे धुण्यासाठी त्या गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या तिन्ही मुलीही होत्या. साबण, धुण्यासाठीचे कपडे तलावाच्या जवळ आढळून आले आहेत.

त्यावरुन कपडे धुवत असताना तलावात पडून त्यांचा मृत्यू झाला, असावा अशी शंका घेतली जाते आहे. सांगली जिल्ह्यातील्या जत तालुक्यातील पोलीसांकडून या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.

मृत्यू झालेल्यांची नावं :

  1. सुनीता माळी (वय 30),
  2. अमृता माळी (वय 13),
  3. अश्विनी माळी (वय 10)
  4. ऐश्वर्या माळी (वय 7)

संपूर्ण माळी कुटुंबीयांना या घटनेनं मोठा धक्का बसलाय. अख्खं बिळूर गाव या घटनेनं हादरुन गेलंय. तलावात चारही जण पडल्या कशा, त्याच्या बुडून मृत्यू होण्यामागचं नेमकं कारण काय? याचं गूढही वाढलंय. हा अपघात होता की घातपात, या संशयावरुन अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी आता पोलिसांच्या चौकशीतून नेमका काय खुलासा होतो, हे पाहणं महत्त्वाचंय.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.