AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुलतेमालते, सगळेच भिडले, मुलाच्या वडिलांना विद्यूत खांबाला बांधून मरेस्तोवर मारहाण, अख्खं गाव पाहत राहिलं…

मुलांच्या प्रेमाची शिक्षा त्यांच्या आई-वडिलांना भोगावी लागल्याचा, एका धक्कादायक प्रकार सांगलीतील शिराळा तालुक्यात घडला आहे. तेथे प्रेमप्रकरणातून मुलाच्या आई-वडिलांना खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या जबर मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला

चुलतेमालते, सगळेच  भिडले, मुलाच्या वडिलांना विद्यूत खांबाला बांधून मरेस्तोवर मारहाण, अख्खं गाव पाहत राहिलं...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jan 18, 2024 | 1:19 PM
Share

सांगली | 18 जानेवारी 2024 : त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं… मला सांगा तुमचं काय गेलं ? विख्यात कवी मंगेश पाडगावकरांची ही कविता बहुतांश लोकांना माहीत असेल. इतरांच्या प्रेमात तुमचं नाक खुपसू नका, असा साधा सरळ सल्ला देण्यासाठी पाडगावकरांनी ही कविता लिहीली. समाजाला आरसा दाखवण्यासाठी. पण आजच्या युगात ही कविता कितपत लागू होईल, माहीत नाही. पण सांगलीतील एका घटनेबद्दल ऐकून तुमचं काळीज हलेल हे नक्की.

मुलांच्या प्रेमाची शिक्षा त्यांच्या आई-वडिलांना भोगावी लागल्याचा, एका धक्कादायक प्रकार सांगलीतील शिराळा तालुक्यात घडला आहे. तेथे प्रेमप्रकरणातून मुलाच्या आई-वडिलांना खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या जबर मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी बारा जणांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली.

नेमकं काय घडलं ?

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेम संबंधातून मुलीचे आई वडील,चुलत चुलते आणि नातेवाईकांनी मुलाच्या पालकांना मारहाण केली. आधी त्यांना दोरीने वीजेच्या खांबाला बांधण्यात आलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या वडीलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे. दादासाहेब रामचंद्र चौगुले असे मयताचे नाव आहे. या घटनेने शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यात सात जण अटकेत आहेत. यामध्ये मुलीचे आई-वडील, चुलता-चुलती, दाजी यांचा समावेश आहे.

वीजेच्या खांबाला बांधलं आणि.. 

मयत दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेलाय, ते कुठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना वीजेच्या खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले हे बेशुद्ध झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.