AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birbhum Violence | आमच्या घराला आग लावलेय, तरुणाचा मित्राला फोन; नवदाम्पत्यासह आठ जणांचे कोळसा झालेले मृतदेह सापडले

"आम्हाला एका घरात डांबून आग लावण्यात आली आहे, पोलिसांना पाठवण्याची व्यवस्था कर" असं साजीदूरने सांगितलं. त्यानंतर माहिमने आपल्या वडिलांना याविषयी सांगितलं. मात्र साजीदूरशी पुन्हा फोन करण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले.

Birbhum Violence | आमच्या घराला आग लावलेय, तरुणाचा मित्राला फोन; नवदाम्पत्यासह आठ जणांचे कोळसा झालेले मृतदेह सापडले
बीरभूम हिंसाचारात आठ जणांचा मृत्यूImage Credit source: सोशल
| Updated on: Mar 24, 2022 | 10:13 AM
Share

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम (Birbhum) येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार (West Bengal Violence) उफाळला आहे. संतप्त जमावाने जवळपास डझनभर घरं पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत होरपळून आठ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत 22 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अशातच या अग्निकांडाशी संबंधित हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. बीरभूम हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांमध्ये एका नवदाम्पत्याचाही (Newly Married Couple) समावेश होता.

काय आहे प्रकरण?

शबे-बारातच्या निमित्ताने लिली खातून आपले पती काजी साजीदूर यांच्यासह बगतुई गावातील आपल्या माहेरी आली होती. सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास साजीदूर यांनी आपला मित्र काजी माहिमला फोन केला. साजीदूरचा थरथरणारा आवाज ऐकूनच मित्राला धडकी भरली. ‘आज तक’च्या वेबसाईटवर यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे.

तरुणाचा मित्राला फोन

“आम्हाला एका घरात डांबून आग लावण्यात आली आहे, पोलिसांना पाठवण्याची व्यवस्था कर” असं साजीदूरने सांगितलं. त्यानंतर माहिमने आपल्या वडिलांना याविषयी सांगितलं. मात्र साजीदूरशी पुन्हा फोन करण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी लिली आणि साजीदूर या दोघांचे जळून कोळसा झालेले मृतदेह आढळले.

या घटनेनंतर साजीदूरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीरभूममधील नानूरला राहणाऱ्या साजीदूरचा विवाह नुकताच मिजारुल शेख यांची कन्या लिली खातूनसोबत झाला होता. जानेवारीत झालेल्या या निकाहानंतर सोमवारी लिली नवऱ्यासह माहेरी आली होती. संध्याकाळपर्यंत सर्वकाही आलबेल होतं, मात्र अचानकच होत्याचं नव्हतं झालं.

‘त्या’ रात्री काय घडलं?

सोमवारच्या रात्री बॉम्बच्या आवाजांनी बोगतुई गावातील ग्रामस्थ दचकून जागे झाले. अनेक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचं त्यांनी पाहिलं. अनेक जणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनाही बोलवण्यात आलं. मात्र अनेक घरं भस्मसात झाली होती. पोलिसांनी एका घरातून सात मृतदेह बाहेर काढले. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. तर एका गंभीर जखमी व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव तापाने फणफणला, अवघ्या तीन दिवसात कोरोनाने मृत्यू

लग्नानंतर 24 तासात नववधूला वैधव्य, कार सजवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.