Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘व्हॅलेंटाईन्स डे’ नाही, अरविंद केजरीवालांनी शपथविधीसाठी निवडला वेगळा मुहूर्त

अरविंद केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तो दिवस होता 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे!

'व्हॅलेंटाईन्स डे' नाही, अरविंद केजरीवालांनी शपथविधीसाठी निवडला वेगळा मुहूर्त
Follow us
| Updated on: Feb 12, 2020 | 11:09 AM

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारल्यानंतर ‘आम आदमी पक्षा’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. येत्या रविवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला मैदानावर केजरीवालांचा शपथविधी (Arvind Kejriwal Oath Ceremony Date) होणार आहे.

काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर अरविंद केजरीवालही दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 62 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 8 जागांवर समाधान मानावं लागत आहे. काँग्रेसचा पुरता सुपडासाफ झाला आहे. दिल्लीतील सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

14 फेब्रुवारीचं कनेक्शन तुटलं

अरविंद केजरीवाल यांनी सर्वात आधी 28 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र, 49 दिवसांनंतर 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

2013 मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला 31, ‘आप’ला 28 आणि काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळाला होता. या त्रिशंकू स्थितीत ‘आप’ने काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केलं होतं. मात्र अवघ्या 49 दिवसांमध्येच अरविंद केजरीवाल यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.

मोठ्या राजकीय नाट्यानंतर 2015 मध्ये दिल्लीत पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. ‘आप’ने या निवडणुकीत पूर्ण ताकद लावून 70 पैकी 67 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं, तर भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर जनतेचे आभार मानले. दिल्लीतील ‘आप’ कार्यालयाबाहेर केजरीवालांनी माध्यमांशी संवाद साधला. “सर्व दिल्लीवासीयांचे आभार. त्यांनी मला तिसऱ्यांदा निवडून देऊन ही संधी दिली. हा कामाचा विजय आहे, हा देशाचा विजय आहे, हा भारतमातेचा विजय आहे”, असं केजरीवाल म्हणाले. दिल्लीवालो आपने कमालही कर दिया, I Love You, असं म्हणत केजरीवालांनी दिल्लीकरांवरील प्रेम (Arvind Kejriwal Oath Ceremony Date) जाहीर केलं.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.