AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NVS : नवोदय विद्यालयात सहावी आणि नववीसाठी प्रवेश घ्यायचाय? प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याचं आवाहन

इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी नोंदणी 30 नोव्हेंबरपर्यंत करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

NVS : नवोदय विद्यालयात सहावी आणि नववीसाठी प्रवेश घ्यायचाय? प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याचं आवाहन
Student
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 7:00 AM

पुणे : नवोदय विद्यालय समिती (NVS) ने जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी च्या प्रवेश परीक्षा नोंदणीस मुदतवाढ दिलेली आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी नोंदणी 30 नोव्हेंबरपर्यंत करण्याचं आवाहन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना nvsadmissionclassnine.in आणि https://cbseitms.nic.in/ या वेबसाईटवर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सहावीसाठी 30 एप्रिल तर नववीसाठी 9 एप्रिलला परीक्षा

नवोदय विद्यालय समितीनं जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता 9 वी च्या प्रवेशासाठी 9 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. तर इयत्ता सहावीसाठी 30 एप्रिल 2022 रोजी परीक्षा घेण्यात येईल. प्रवेश परीक्षा देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व सुरक्षा खबरदारी किंवा कोविड प्रोटोकॉलचे पालन करून घेतल्या जाणार आहेत.

प्रवेश परीक्षेसाठी अर्ज कुठे करायचा?

इयत्ता 9 वीच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://www.nvsadmissionclassnine.in/nvs/homepage या वेबसाईटला भेट द्यावी तर सहावीच्या वर्गासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करावा.

कोण अर्ज करू शकतो?

नवोदय विद्यालय समितीद्वारे जारी केलेल्या माहितीपत्रकानुसार नववीची प्रवेश परीक्षा देणारा विद्यार्थी 2021-22 या शैक्षणिक वर्षात आठवीच्या वर्गात शिकत असावा. तर, सहावीच्या वर्गासाठी प्रवेश परीक्षा देणारा विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिकत असावा.

परीक्षेचे स्वरुप

जेएनवी इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा इंग्रजी, हिंदी संबंधित राज्यातील प्रादेशिक भाषेत आयोजित केली जाते. प्रवेश परीक्षेचा वेळ दोन तासांचा असतो. यामध्ये तीन विभाग असतात आणि 80 वस्तूनिष्ट प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा एकूण 100 गुणांची असते. मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित परीक्षण आणि भाषा कौशल्य या विषयावर प्रश्न विचारले जातात. JNVST इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नवोदय विद्यालय समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी लागते. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरचं निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित मानला जातो.

इतर बातम्या:

MPSC चा धडाका सुरुच, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, औषध निरीक्षक पदाच्या 87 जागांसाठी जाहिरात

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित; … तर संपत्तीही जप्त होणार

Navodaya Vidyalaya Samiti class six and class nine entrance exam dates extended till 30 November check details here

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...