AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RTE च्या प्रवेशांना आणखी एकदा मुदतवाढ, 23 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन

आरटीई अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2021-22 करीताच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेनुसार निवड झालेल्या पाल्‍याचा प्रवेश घेण्‍यासाठी आता दिनांक 23 जुलै, 2021 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

RTE च्या प्रवेशांना आणखी एकदा मुदतवाढ, 23 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन
आरटीई प्रवेश
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 6:43 PM

मुंबई: आरटीई अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2021-22 करीताच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेनुसार निवड झालेल्या पाल्‍याचा प्रवेश घेण्‍यासाठी आता दिनांक 23 जुलै, 2021 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009” अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता पात्र खासगी विना-अनुदानित शाळांतील (अल्पसंख्याक शाळा वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात (entry level) वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. या राखीव जागांवर ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येऊन प्रवेश दिले जातात.

23 जुलैपर्यंत मुदतवाढ

आरटीई 25 टक्के अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना दिनांक 30 जून 2021 पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा होता. मात्र, सदर प्रवेशासाठी आता दिनांक 23 जुलै 2021 पर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेकडील 2468 पदं रिक्त

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 352 शाळांमधील 6 हजार 463 जागांपैकी प्रवेशासाठी लॉटरीद्वारे निवड झालेल्या 4 हजार 985 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 517 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. मात्र, अद्यापही निवड यादीतील 2 हजार 468 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित न झाल्यामुळे ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता आता दिनांक 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अजुनही ज्या पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी शाळेशी संपर्क साधला नाही, त्यांनी दिनांक 23 जुलै 2021 पूर्वी शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असेही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

आरटीईअंतर्गत किती जागांवर प्रवेश

मुंबईमधध्ये आरटीई साठी 352 शाळांमध्ये 6 हजार 463 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामधील 292 शाळा या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित आहेत तर 62 शाळा राज्य सरकारच्या शिक्षण बोर्डाशी संलग्नित आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 96801 जागांवर या कायद्यांतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत. राज्याच्या 36 जिल्ह्यातील 9 हजार 431 शाळांमध्ये 25 टक्के जागा आरटीई प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.

RTE च्या 25 टक्के राखीव जागांची सोडत जाहीर, पालकांना ‘या’ तारखेपासून प्रवेशाची सूचना मिळणार

RTE अंतर्गत प्रवेश नोंदणी सुरु, 96 हजार विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण

Right to Education admission finalization date extend till 23 July

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.