AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 फ्री एण्ड फेअर निवडणूका झाल्या असत्या तर भाजपाला 40 ही जागा मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई उत्तर - पश्चिम मतदार संघात मतमोजणीत आमच्या आणि त्यांच्या मतात 650 मतांचा फरक आलेला असल्याचे अनिल परब यांनी यावेळी सांगितले. 22 ते 23 फेरीनंतर एकदम मते जाहीर केल्याचे परब म्हणाले.

 फ्री एण्ड फेअर निवडणूका झाल्या असत्या तर भाजपाला 40 ही जागा मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरे यांचा आरोप
Aaditya ThackerayImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 17, 2024 | 3:34 PM
Share

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचा निकाल वादात सापडला आहे. या लोकसभा जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा निसटता पराभव झाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला आहे. EVM संबंधी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या कालच केलेल्या आरोपानंतर या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ईव्हीएमबाबतचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. परंतू त्यानंतरही या मतमोजणी केंद्रात एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रतिनिधीकडे असलेल्या मोबाईल फोनवरुन गुन्हा दाखल झालेला आहे, त्यातच आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या मुंबई उत्तर पश्चिम निकालावरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाप्रमाणे देशातील इतरही मतदारसंघात निवडणूक यंत्रणेचा गैरवापर केलेला आहे. तर खरोखरच निवडणूक पारदर्शक झाली असती तर भाजपाला देशात 40 जागाही मिळाल्या नसत्या असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदार संघात झालेल्या गडबडीवरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला आहे. यावेळी शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी आरोप केला आहे की निवडणूकीच्या मतमोजणीत19 फेरीनंतर जसा जसा निकालाचे आकडे जवळ जवळ येत होते तशी तशी पारदर्शकता बंद झाली. आधी प्रत्येक फेरीनंतर मतदानाचे आकडे आरओ अनाऊन्समेंट करुन सांगत होते. 19 फेरीनंतर ही प्रक्रिया बंद झाली. त्यानंतर थेट 22 व्या फेरीलाच आकडे सांगितल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

650 मतांचा फरक

सहा मतदार संघ असले तर एआरओच्या टेबल जवळ एक लोकप्रतिनिधींचा प्रतिनिधी असतो. एक राऊंड झाल्यानंतर त्यांच्या समोर 14 टेबलची टॅली करुन हे आकडे सांगितले जातात. नंतर आरओला आकडे दिले जातात. परंतू यावेळी आमच्या प्रतिनिधीत आणि एआरओ यांच्यात प्रचंड अंतर होते. मोठी जाळी होती. ते काय करत आहेत हे कळत नव्हते असेही अनिल परब म्हणाले. उमेदवाराला 17 c फॉर्म दिला जातो. हा प्रत्येक ईव्हीएम मतपेटीत किती मते असतात ? ती मोजल्यानंतर ती किती आहेत ती दाखवून सही घेतली जाते. केंद्राध्यक्षाची सही करुन या 17 c फॉर्म प्रमाणे मते मतपेटीत मोजली का याची टॅली आपल्याला नंतर करुन खातर जमा करता येते. त्यानंतर फॉर्म 17 c part 2 हा देखील देण्याची तरदूत असते. यावेळी हा फॉर्म 17 c part 2 मागणी करुन ही दिला नाही. या फॉर्मद्वारे आमची मते आणि त्यांची मोजलेली मते याची टॅली होते. आमच्या आणि त्यांच्या मतात आमच्या मोजणीनूसार 650 मतांचा फरक आलेला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. 22 ते 23 फेरीनंतर एकदम मते जाहीर केल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.