AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मोदी, शाह यांचा ग्रीन सिग्नल, कुणी केला दावा ?

राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. याच महायुतीतील शिंदे सरकारच्या एका नेत्यानेही दावा केला असून कॅबिनेटची विस्तार राज्यात करावाच लागेल असे म्हटले आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी दावा केला आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मोदी, शाह यांचा ग्रीन सिग्नल, कुणी केला दावा ?
| Updated on: Jun 05, 2024 | 3:25 PM
Share

लोकसभा निवडणुकीत एनडीला बहुमत मिळालं असलं तरी भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपची बरीच पिछेहाट झाली आहे. दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केले जाणार आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. याच महायुतीतील शिंदे सरकारच्या एका नेत्यानेही दावा केला असून कॅबिनेटची विस्तार राज्यात करावाच लागेल असे म्हटले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे.

कॅबिनेटचा विस्तार महाराष्ट्रात करावाच लागेल, एक लिमिट असते. तुम्ही पूर्ण कॅबिनेट बनवू शकले नाहीत हा शिक्का राहील, त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्री मंडळाचा हा विस्तार होईल. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ग्रीन सिग्नल असेही शिरसाट म्हणाले. आज भाजपची अंतर्गत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्याताली भाजपच्या पराभवाची कारणं शोधली जाणार असून मंत्रीमंडळविस्तारासंदर्भातही चर्चा होणार आहे, असे समजते. आगामी विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे, असे वृत्त आहे.

यांसदर्भातच संजय शिरसाट यांनीही भाष्य करत लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा केला आहे.

सरकारला कोणताही धोका नाही

लोकसभा निवडणूकीत भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळाले असून आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही दलांच्या बैठकांचा जोर दिल्लीत सुरु झाला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी घाई सुरू झाली आहे. या मुद्यावरी संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. एनडीएचं सरकार स्थापन व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. नितेश कुमार , चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन आपण सरकार बनवू असं काहींना वाटू लागलंय. पण सरकारला कोणताच धोका नाही, 26 पक्षांपेक्षा या चार पक्षाचं सरकार केव्हाही चांगलं. इंडीया सरकार बनवेल असं वाटतं नाही. १० तारखेच्या आत एनडीए सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितिश कुमार इंडिया आघाडीत जाणार नाहीत असे सांगत संजय राऊत लालूच देण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसला

लोकसभा निवडणुकीता राज्यात महायुतीला केवळ अवघ्या १७ जागा मिळाल्या, भाजपचीही पिछेहाट झाली. याची कारणमीमांसा करताना संजय शिरसाट यांनी आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसल्याचे स्पष्ट मत मांडले. सर्व्हे, जागा वाटपात दिरंगाई झालाी त्याचाही फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. ग्राऊंड लेव्हलला कार्यकर्त्याला महत्व देणं गरजेचे असून ज्या गोष्टी राहिल्या त्यांनी उणीव विधानसभेत भरून काढू असे शिरसाट यांनी सांगितले. सतराचा खतरा वाटत नाही, ताक फुंकून पिऊ, दुध गरम होतं आम्ही ताक समजून पीत होतो. पण मतदारांना गृहीत धरणं चुकीचं आहे, मतदार जागा दाखवतो, असं शिरसाट म्हणाले

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.