Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab | काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का! हरजोत कमलनंतर काँग्रेसचे आणखी 5 ज्येष्ठ नेते भाजपात दाखल

Punjab Assembly Election 2022 : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता काही राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे. अमृतसह जिल्ह्यातील काँग्रेस समितीच्या ग्रामिण विभागाचे अध्यक्ष भगवंतपाल सिंह यांच्यासह काँग्रेसच्या पाच ज्येष्ठ नेत्यांनी....

Punjab | काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का! हरजोत कमलनंतर काँग्रेसचे आणखी 5 ज्येष्ठ नेते भाजपात दाखल
Congress Flag
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 8:24 PM

पंजाब : आगामी विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर (Punjab Assembly Election 2022) या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा सिलसिला यंदाही कायम असल्याचं पंजाबमध्येदेखील पाहायला मिळतंय. दरम्यान, नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार पंजाबमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे पाच मोठे नेते हे भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता काही राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे. अमृतसह जिल्ह्यातील काँग्रेस समितीच्या ग्रामिण विभागाचे अध्यक्ष भगवंतपाल सिंह यांच्यासह काँग्रेसच्या पाच ज्येष्ठ नेत्यांनी भाजपात (BJP) प्रवेश केल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रदीप सिंह भुल्लर, रतन सिंह सोहल, परमजीत सिंह रंधावा आणि तंजिंदरपाल सिंह यांचा समावेश आहे.

काँग्रेसला धक्का

नुकताच काँग्रेसला एक मोठा धक्का बसला. काँग्रेस आमदार हरजोत कमल यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशानंही काँग्रेसच्या गटात खळबळ उडाली होती. पंजाबात सोनू सूद यांच्या बहिणीला मोगा येथून उमेदवार देण्यात आल्यानं त्यांनी भाजपात प्रवेश केला असल्याची चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे काँग्रेसनं आपल्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात मालविका सूद यांनाही मोगातून उमेदवारी देण्यात येत असल्याचं स्पष्ट झालंय. चमकौर साहिब येथून मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे निवडणूक लढवणार आहेत. तर अमृतसर पूर्वेतील नवज्योत सिंह सिंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर डेरा बाबा नानक इथून उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा हे निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री चन्नी यांचे धाकडे भाऊही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून चन्नी यांचे धाकडे भाऊन डॉ. मनोहर सिंह हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसनं उमेदवारी देण्यासाठी नकार दिल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलंय.

काय आहे पंजाबमधील राजकीय स्थिती?

पंजाब – एकूण जागा 117 भाजप 3 काँग्रेस 77 आप 20 अकाली दल 15

संबंधित बातम्या :

Punjab Assembly Election : मुख्यमंत्री चन्नी यांच्याकडून नागरिकांना गिफ्ट, पंजाबमध्ये वीज 3 रुपये स्वस्त

UP Election 2022 : भाजपला अजून एक मोठा झटका! गुर्जर नेता आणि आमदार अवतार सिंह भडाना यांचा रालोदमध्ये प्रवेश

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.