AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar | पंतप्रधान मोदींना आंबे खाण्याविषयी प्रश्न का विचारला होता? अक्षय कुमारने अखेर दिलं उत्तर

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयला आंबे खाण्यावरून प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याला त्याच्याच मुलाखतीची आठवण झाली. या मुलाखतीत अक्षयला विचारलं गेलं की तुला आंबे खायला आवडतात का? तू आंबे कापून खातोस की चोखून?

Akshay Kumar | पंतप्रधान मोदींना आंबे खाण्याविषयी प्रश्न का विचारला होता? अक्षय कुमारने अखेर दिलं उत्तर
Akshay Kumar and PM ModiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 8:29 AM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली, तेव्हा त्याची चर्चा देशभरात झाली. या मुलाखतीत अक्षयने काही असेही प्रश्न विचारले, ज्यावरून सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. असाच एक प्रश्न होता आंबे खाण्याचा. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयला आंबे खाण्यावरून प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याला त्याच्याच मुलाखतीची आठवण झाली. या मुलाखतीत अक्षयला विचारलं गेलं की तुला आंबे खायला आवडतात का? तू आंबे कापून खातोस की चोखून?

मुलाखतीत विचारलेल्या या प्रश्नावरून अक्षयला लगेच त्याने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीची आठवण झाली. तो म्हणाला, “तुम्ही मला हा प्रश्न मला थेट का विचारत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी हा प्रश्न विचारला होता, आता तुम्ही मला तोच प्रश्न विचारत आहात. पण तुम्ही मला हा प्रश्न थेट नाही विचारला.”

आंब्याच्या प्रश्नावर उत्तर

पुढे हसत तो म्हणतो, “तुमचा प्रश्न माझ्या हृदयापर्यंत नाही तर मेंदूपर्यंत पोहोचला आहे. असो, मी आंबे खूप आवडीने खातो. त्यावेळी आंब्यांचा ऋतू होता. माझ्या मनात काही सर्वसाधारण प्रश्न होते, तेच मी विचारले. सर्वसामान्य व्यक्तीला जे प्रश्न विचारायचे होते, ते मी माझ्या पद्धतीने त्यांना विचारले होते. मी कोणतीच भीती मनात घेऊन त्यांची मुलाखत घ्यायला गेलो नव्हतो.”

हे सुद्धा वाचा

राजकारणात जाण्याविषयी काय म्हणाला अक्षय?

भविष्यात राजकारणात जायचा विचार आहे का, असा प्रश्न अक्षय कुमारला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “सध्या तरी असा कोणताच विचार नाही. यावर्षी मी एका वेब सीरिजचं शूटिंग करणार आहे. मी राजकारणात जाईन याचा कधी विचारच केला नाही. मात्र पुढे काय होईल ते सांगता येत नाही. पण सध्या तरी मला त्यात काही रस नाही. सध्या मला फक्त चित्रपटांत काम करायचं आहे आणि लोकांचं मनोरंजन करायचं आहे. राजकारण सध्या माझ्या मनात नाही.”

मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्...
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्....
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष.
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.