AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉसमधील ‘त्या’ कृत्याबद्दल अंकिता लोखंडेला पश्चात्ताप; स्वत:च दिली कबुली

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अखेर अंकिता लोखंडेनं माध्यमांना मुलाखती देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती माध्यमांना दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं गेलं होतं. यामागचं कारणसुद्धा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

बिग बॉसमधील 'त्या' कृत्याबद्दल अंकिता लोखंडेला पश्चात्ताप; स्वत:च दिली कबुली
अंकिता लोखंडेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 1:45 PM

मुंबई: 7 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ‘बिग बॉस 17’मधील प्रवास फारच चर्चेतला होता. टॉप 4 पर्यंत पोहोचून ती बाद झाली. मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार या तिघांना तिने तगडी टक्कर दिली होती. ग्रँड फिनालेनंतर अंकिताचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही ती माध्यमांना मुलाखती देण्यास तयार नव्हती. इतकंच नव्हे तर फिनालेनंतर ती पत्रकारांकडे दुर्लक्ष करत निघून गेली होती. यावर आणि मन्नारा चोप्रासोबतच्या भांडणावर आता ती मोकळेपणे व्यक्त झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती बिग बॉसशी संबंधित विविध मुद्द्यांवर बोलली.

मीडियाला का दुर्लक्ष केलं?

“शो संपल्यानंतर मी निराश किंवा उदास नव्हते. पण माझी तब्येत बरी नव्हती. मला फक्त घरी जाऊन आराम करायचं होतं. मी माध्यमांना दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांची माफी मागते. माझी प्रकृती अजूनही पूर्णपणे बरी नाही”, असं स्पष्टीकरण अंकिताने दिलं. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला अंकिता आणि मन्नारा चोप्रा यांची चांगली मैत्री होती. मात्र मन्नाराची जवळीक विकीसोबतच वाढताच अंकिताच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. बिग बॉसच्या घरात या दोघींमध्ये खूप भांडणं झाली.

त्या गोष्टीचा पश्चात्ताप

मन्नारासोबतच्या वादाबद्दल अंकिताने आता पश्चात्ताप व्यक्त केला आहे. याविषयी ती पुढे म्हणाली, “बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मी एपिसोड्स बघत होती आणि तेव्हा मी पाहिलं की सुरुवातीला माझं मन्नाराशी खूप चांगलं जमायचं. पण नंतर तिने तिचा मार्ग बदलला. तिला काही गोष्टी जाणवू लागल्या होत्या आणि त्याबद्दल माझी कोणतीच समस्या नव्हती. पण शेवटच्या काही एपिसोड्समध्ये माझ्यात आणि विकीमध्ये बऱ्याच गोष्टी चालू होत्या. त्यात मला त्यांची मैत्री खटकू लागली होती. मन्नारा आणि माझ्यात वाद होते पण तिचे मित्र तिला सोडून गेल्यानंतर ती विकीकडे आली होती. त्यामुळे विकीच का, असा प्रश्न मला पडला होता. हळूहळू या गोष्टी वाढत गेल्या आणि माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. पण जेव्हा मी बाहेर आल्यानंतर एपिसोड्स पाहू लागले, तेव्हा मला समजलं की असं काहीच नव्हतं. सगळे माझ्या मनाचे खेळ होते. आता मला त्या गोष्टींचा पश्चात्ताप होतो.”

हे सुद्धा वाचा

ट्रोलिंगवर प्रतिक्रिया

अंकिताला अनेकदा सोशल मीडियावर बॉडीशेम आणि ट्रोल केलं गेलं. त्यावरही तिने प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही जेव्हा बिग बॉसमध्ये जात होतो, तेव्हा आम्हाला कल्पना होतीच की असं काहीतरी घडेल. त्यामुळे आम्ही सर्व प्रकारच्या ट्रोलिंगसाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो. ते बिग बॉसचं घर होतं. तिथे तुम्ही कोणाला रोखू शकत नाही की माझ्याबद्दल बोलू नका. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. मीसुद्धा लोकांबद्दल बोलले आहे. पण मी कोणालाच बॉडीशेम केलं नाही”, असं ती पुढे म्हणाली.

मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.