AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा विकून आयुष्य जगत होते अन्नू कपूर, चांगल्या चित्रपटांनी त्यांच्या करिअरला दिलं वळणं

अन्नु कपूर यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, त्याचबरोबर त्यांनी केलेल्या भूमिका सुध्दा त्यांच्या चाहत्यांच्या अधिक लक्षात आहेत असं म्हणायला हरकत नाही. ते ज्यावेळी रेडिओवरती एखादी गोष्ट किंवा कहाणी सांगत असतात त्यावेळी अनेकांचे कान त्यांच्या बोलण्याकडे टवकारलेले असतात.

चहा विकून आयुष्य जगत होते अन्नू कपूर, चांगल्या चित्रपटांनी त्यांच्या करिअरला दिलं वळणं
| Updated on: Feb 20, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई – अन्नू कपूर (Annu Kapoor) यांचा आवाज कानावर पडला तरी अनेकजण लगेच म्हणतात की, हा अन्नू कपूरचा आवाज आहे. कारण त्यांच्या जादुई आवाजाचे अनेक चाहते भारतात आहेत. ते बोलत असताना अनेकजण शांत ऐकत बसतात. कारण प्रत्येकवेळी ते काहीतरी लोकांना नवीन सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना उत्तम सादरकर्ता असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी केलेले सादरीकरण लोक आजही आठवून सांगतात. त्यांनी त्यांची करिअरमध्ये (career) खूप संघर्ष केलाय. कारण त्यांच्या घरची परिस्थिती ज्यावेळी हालाकीची होती. त्यावेळी त्यांना शाळा सोडून चहा विकला. जशी त्यांच्या घरची परिस्थीती बदलली त्यावेळी त्यांनी त्यांचं अर्धवट राहिलेलं शिक्षण (education)घेतलं. संघर्ष कोणाला चुकलेला नाही. तसेच संघर्ष केल्याशिवाय कोणी मोठा होऊ शकत नाही असं अन्नु कपूर म्हणतात. त्यांना रेडिओच्या माध्यमातून ऐकत असताना तुम्हाला एखादा चित्र न दिसता ते तुमच्या डोळ्यासमोर उभं करतात याला उत्तम सादरकर्ता म्हणतात.

रेडिओवरती बोलत असताना अनेकांचे कान त्यांच्याकडे असतात

अन्नु कपूर यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, त्याचबरोबर त्यांनी केलेल्या भूमिका सुध्दा त्यांच्या चाहत्यांच्या अधिक लक्षात आहेत असं म्हणायला हरकत नाही. ते ज्यावेळी रेडिओवरती एखादी गोष्ट किंवा कहाणी सांगत असतात त्यावेळी अनेकांचे कान त्यांच्या बोलण्याकडे टवकारलेले असतात. कारण 80 च्या दशकातील स्टोरी सांगाव्या त्यांनी आणि ऐकाव्या तुम्ही असं सुत्र आहे. कोरोनाच्या काळात लोकांना मदत करून फोटो काढणा-या लोकांना त्यांनी स्पष्टशब्दात फटकारलं होतं. ते म्हणाले, दोन रोटी देणार आणि तब्बल २० फोटो काढणार…

पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड

अन्नु मलिक यांनी त्यांच्या मंडी चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरूवात केली होती. हा चित्रपट 1983 ला प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळखायला लागले कारण त्यांची बॉलीवूडमध्ये चित्रपट यायच्या आगोदर अजिबात ओळख नव्हती. तसेच त्यांना पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांच्या वडिल एका पंजाबी घरातून आहेत, तर त्यांची आई एका बंगाली घरातून आहे. अन्नु मलिक यांनी दोन लग्न केली आहेत. एक परदेशी पत्नी आहे, तर एक भारतीय पत्नी आहे. अन्नु कपूर यांनी त्यांची स्वत:ची ओळख केली आहे. माझा बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कोणी गॉडफादर नाही.

पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार, आणखी राज्यात किती प्रकल्प आणि निधीची व्यवस्था काय?

Hijab : हिजाब घालून मतदान करायला आलेल्या महिलेला भाजप कार्यकर्त्यानं रोखलं, तामिळनाडूतील प्रकार

Jhund Song: लफडा झाला वाकडा तिकडा, नागराजच्या झूंडचं दुसरं गाणं रिलिज, झिंगाटपेक्षा भारी?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.