AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर लव्ह ट्रँगलबद्दल अर्जुन कपूर स्पष्टच बोलला..

मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेता अर्जुन कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लव्ह ट्रँगलबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी प्रेमाच्या त्रिकोणाबाबत त्याने स्पष्ट मत मांडलं. मलायका आणि अर्जुन यांचा काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झाला.

मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर लव्ह ट्रँगलबद्दल अर्जुन कपूर स्पष्टच बोलला..
अर्जुन कपूर, मलायका अरोराImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 19, 2025 | 2:20 PM

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालं. बॉलिवूडमधील ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. वयातील अंतरावरून या दोघांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगलाही न जुमानता दोघं एकमेकांवर खुलेपणाने प्रेमाचा वर्षाव करायचे. अर्जुन आणि मलायका यांचं ब्रेकअप कशामुळे झालं, यामागचं कारण स्पष्ट झालं नाही. दोघांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन ‘लव्ह ट्रँगल’बद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. आगामी ‘मेरे हसबंज की बिवी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अर्जुनने ही मुलाखत दिली होती. या चित्रपटात प्रेमातील त्रिकोणाबद्दलची (लव्ह ट्रँगल) कथा दाखवण्यात आली आहे.

या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “या परिस्थितीत त्या बिचाऱ्यासोबत जे घडलंय आणि त्याचा भूतकाळ परत येतो कारण तिचा स्मृतीभ्रंश होतो. खऱ्या आयुष्यात अशा परिस्थितीत अडकणं ही मजेशीर गोष्ट नाही. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, कोणीच अशा परिस्थितीमध्ये अडकू नये किंवा स्वत:ला अशा दुहेरी अडचणीत आणू नये. हे योग्य आहे असं मला वाटत नाही. मला खात्री आहे की काही लोकांच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते, जिथे ते दोन लोकांमध्ये अडकतात. पण त्यात काही मजेशीर नसतं. एक ना एक जण दुखावला जातोच. नात्यात राहण्याचा हा काही चांगला मार्ग नाही.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

कॉमेडियन हर्ष गुजरालसुद्धा या मुलाखतीत अर्जुन कपूरसोबत उपस्थित होता. चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना त्याने अर्जुन कपूर अजूनही सिंगल असल्याचा खुलासा केला. मलायकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुनच्या आयुष्यात दुसरी कोणती मुलगी आली नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय. “माझ्याबाबतीत हे खरंय की माझ्या खऱ्या आयुष्यातही सिंगल आहे आणि अर्जुन भावाच्या खऱ्या आयुष्यातही तो सिंगल आहे. त्यामुळे आम्ही हे सर्व फक्त चित्रपटासाठी करतोय”, असं तो म्हणाला.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ब्रेकअप केला. अर्जुनने एका कार्यक्रमात सर्वांसमोर ‘मी आता सिंगल आहे’ असं म्हटलं होतं. त्यानंतर मलायकानेही अप्रत्यक्षपणे रिलेशनशिपमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ब्रेकअपनंतर जेव्हा मलायकाच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा अर्जुन तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला होता. त्यानंतर नुकतीच त्याने मलायकाच्या शोमध्येही पाहुणा म्हणून हजेरी लावली होती.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.