Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Vidyarthi | ‘ती फक्त माझ्या मुलाची आई..’; दुसऱ्या लग्नाबाबत आशिष विद्यार्थी झाले व्यक्त

अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी रुपाली बरुआशी दुसरं लग्न केलं. रुपाली यांच्याशी पहिल्यांदा भेट कशी झाली आणि दुसऱ्या लग्नाबाबतच्या निर्णयावर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती, याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला.

Ashish Vidyarthi | 'ती फक्त माझ्या मुलाची आई..'; दुसऱ्या लग्नाबाबत आशिष विद्यार्थी झाले व्यक्त
पिलू विद्यार्थी, आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नी
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 10:38 PM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी रुपाली बरुआ यांच्याशी दुसरं लग्न केलं. 25 मे रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. याआधी त्यांनी अभिनेत्री राजोशी बरुआ (पिलू विद्यार्थी) यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांमध्ये त्यांचीच चर्चा आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आशिष यांनी रुपाली यांच्यासोबत पहिली भेट कशी झाली आणि दुसऱ्या लग्नाच्या निर्णयानंतर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

रुपाली यांच्याशी पहिली भेट कशी झाली?

“पिलूशी घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर माझ्या एका व्लॉगिंगच्या असाइनमेंटदरम्यान रुपालीशी पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत आमची चांगली मैत्री झाली. रुपालीने तिच्या आयुष्यातील दु:ख माझ्यासमोर मांडलं. पाच वर्षांपूर्वी तिने तिच्या पतीला गमावलं होतं. मात्र त्यानंतर तिने लग्नाचा कधी विचार केला नव्हता. पण जसजसं आम्ही एकमेकांशी बोलू लागलो, तसतसं जाणवलं की रुपाली तिच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीकोनातून बघू शकते आणि पुन्हा एकदा लग्नाचा विचार करू शकते. ती 50 वर्षांची आहे आणि मी 57 वर्षांचा आहे. आम्ही लग्न का करू नये? वय आणि इतर गोष्टींचा विचार न करता आपण सर्वजण खुश राहू शकतो. आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे हेच माझ्या आयुष्यातील मुख्य उद्दिष्ट आहे आणि तीच माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे”, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या लग्नानंतर कुटुंबातील वातावरण

आशिष यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुटुंबीयांवर काय परिणाम झाला याबद्दलही ते व्यक्त झाले. ते पुढे म्हणाले, “पिलू आणि माझ्या लग्नाच्या बऱ्याच चांगल्या आठवणी आहेत, ज्या आम्ही एकमेकांच्या मनात कायम जपून ठेवणार आहोत. पिलू ही फक्त माझ्या मुलाची आई आहे, असं मी तिला कधीच समजलो नाही. पिलू ही माझी मैत्रीण आहे, ती माझी पत्नी होती. हे सर्व कोणत्याही दु:खाशिवाय झालं असं कृपया समजू नका. एका व्यक्तीपासून विभक्त होणं हे नेहमी दु:खदायकच असतं. ती संपूर्ण प्रक्रिया खूप कठीण असते. पिलू आणि मी या दु:खातून गेलो आहोत. पण अखेर हा तुमचा निर्णय असतो की तुम्हाला त्या दु:खासोबत जगायचं आहे की त्यातून पुढे जायचं आहे. आयुष्य हे असंच असतं.”

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.