Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | सोबत खेळले, चर्चेतही राहिले, आता असं काय घडलं ज्यामुळे बिग बॉसची ‘मंडली’ तुटली?

बिग बॉसच्या घरात एकमेकांसोबत नातं टिकवणं हे स्पर्धकांसमोर सर्वांत कठीण आव्हान असतं. प्रत्येक सिझननुसार नव्या नाती प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सोळाव्या सिझनमध्ये काही स्पर्धकांनी मिळून मंडली बनवली.

Bigg Boss 16 | सोबत खेळले, चर्चेतही राहिले, आता असं काय घडलं ज्यामुळे बिग बॉसची 'मंडली' तुटली?
Bigg Boss 16 MandaliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 3:38 PM

मुंबई : बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जेव्हा ट्रॉफीसाठी एकमेकांविरोधात उभे असतात, तेव्हा मैत्री कितीही घट्ट असली तरी त्यात वितुष्ट येताना अनेकदा पाहिलं गेलंय. बिग बॉसच्या घरात नाती टिकवणं हे स्पर्धकांसमोरील मोठं आव्हान असतं. मात्र प्रत्येक सिझननुसार नवीन नातीसुद्धा बनतात. बिग बॉसचा सोळावा सिझन चांगलाच गाजला. एकीकडे सर्वांशी पंगा घेऊन प्रियांका चहर चौधरीने स्वतंत्र खेळाकडे लक्ष केंद्रित केलं. तर दुसरीकडे मैत्रीच्या नावाखातर काही स्पर्धकांनी मिळून मंडली बनवली. याच मंडलीच्या माध्यमातून हे स्पर्धक खेळात पुढे सरकले. मात्र या मंडलीमधील स्पर्धकांची मैत्री पाहून चाहते फार खुश झाले होते.

बिग बॉसची ट्रॉफीसुद्धा मंडलीचा सदस्य एमसी स्टॅनने जिंकली. संपूर्ण मंडलीला एमसी स्टॅनच्या विजयापेक्षा प्रियांका चहर चौधरीच्या पराजयाने जास्त आनंद झाला होता. बिग बॉसचा शो संपल्यानंतरही मंडलीतील सदस्य एकत्र दिसले. कधी पार्ट्यांमध्ये तर कधी इव्हेंट्समध्ये मंडलीतील सदस्यांना सोबत पाहिलं गेलं. साजिद खानने बनवलेली ही मंडली बराच वेळ चर्चेत राहिली. मात्र आता ही मंडली तुटल्याचं पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून मंडलीतील सदस्य एकत्र दिसत नव्हते. या मंडलीत साजिद खान, अब्दु रोझिक, निमृत कौर आहलुवालिया, एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि सुंबुल तौकिर खान यांचा समावेश होता. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात निमृतला मंडलीबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर ती कंटाळून म्हणाली, “नेहमीच काय मंडलीबद्दल प्रश्न विचारता?” याशिवाय आणखी एका व्हिडीओमध्ये अब्दु रोझिक म्हणताना दिसतोय की, “मंडली खत्म”.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये अब्दुला एमसी स्टॅनबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर अब्दु म्हणतो “दोस्ती खत्म”. अब्दु आणि एमसी स्टॅन यांच्यात काहीतरी वाद झाल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शिव आणि निमृत एकत्र म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार होते. मात्र त्यांच्या या व्हिडीओचंही काम अद्याप सुरू झालं नाही. त्यामुळे फक्त बिग बॉसमध्ये टिकून राहण्यासाठी मंडलीतील स्पर्धकांनी एकमेकांशी मैत्री केली होती का, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.