AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swami Om | ‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन, 3 महिन्यापूर्वी झाली होती कोरोनाची लागण!

‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम (Swami Om) यांचे निधन झाले आहे. काही वेळापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

Swami Om | ‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन, 3 महिन्यापूर्वी झाली होती कोरोनाची लागण!
स्वामी ओम
| Updated on: Feb 03, 2021 | 2:20 PM
Share

मुंबई :बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम (Swami Om) यांचे निधन झाले आहे. काही वेळापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 3 महिन्यांपूर्वी त्यांना कोरोना देखील झाला होता त्यानंतर त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. बिग बॉसच्या ‘सीझन 10’ मध्ये स्वामी ओम स्पर्धक म्हणून दिसले होते. कोरोना झाल्यावर त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे सांगितले जात आहे, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. याच अवस्थेत, काही काळापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी आपल्या निवासस्थानी डीएलएफ अंकुर विहार येथे अखेरचा श्वास घेतला (Bigg Boss EX Contestant Swami Om Passes away).

कोरोनामधून बरे झाल्यानंतर स्वामी ओम यांना चालण्यास खूप त्रास होत, असल्याचे सांगितले जात होते यानंतर त्यांच्या अर्ध्या शरीरावर अर्धांगवायू झाला ज्यामुळे गेल्या 15 दिवसांत त्याची प्रकृती अधिकच खराब झाली आणि आज (3 फेब्रुवारी) त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे अंतिम संस्कार आज दुपारी दीड वाजता दिल्लीतील निगम बोध घाटावर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोर्टाकडून मिळाला होता दिलासा

‘बिग बॉस’मधील चर्चित स्पर्धक स्वामी ओम यांच्यावर एका गंभीर विषयावर वक्तव्य केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 24 ऑगस्ट 2017 रोजी दहा लाख रुपये दंड ठोठावला होता. वास्तविक, स्वामी ओम यांनी याचिकेत म्हटले होते की, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक करतांना सीजेआयकडून शिफारस का घेतली गेली? यानंतर जेव्हा हे प्रकरण सीजेआय खेहर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आले, तेव्हा कोर्टाने म्हटले की हा पब्लिसिटी स्टंट आहे. परंतु यावर स्वामी ओम यांनी उत्तर दिले की त्यांनी आधीच ‘बिग बॉस’ च्या माध्यमातून बरीच प्रसिद्धी मिळविली आहे. या प्रकरणात, गेल्या वर्षी कोर्टाने त्यांना दिलासा देत, 10 लाख दंडाऐवजी 8 आठवड्यात 5 लाख रुपये जमा करण्यास सांगितले होते.

चोरीचेही आरोप

‘बिग बॉस 10’ ने त्याला ‘कॉन्ट्रोव्हिएशनल गुरू’ असे नाव दिले होते. स्वामी ओमवर सायकल चोरी केल्याचाही आरोप होता. त्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या आरोपाखाली अटक केली होती. ‘बिग बॉस 10’ संपल्यानंतर दिल्लीच्या इंटर स्टेट क्राइम ब्रँचने भजनपुरा भागातून त्यांना अटक केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. स्वामी ओम यांच्यावर चोरी करणे, हत्यारे बाळगणे आणि इतरांच्या घरात घुसणे, असे अनेक आरोप होते. त्यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी करण्यात आले होते.

याशिवाय स्वामी ओम यांच्याकडेही शस्त्रे असल्याचा आरोप होता. त्यांच्यावर आर्म्स अ‍ॅक्ट, टाडा आणि इतर कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ओम यांचे धाकटे बंधू प्रमोद झा यांनी देखील लोधी कॉलनी, दिल्ली येथे एका सायकलच्या दुकानातून 3 लोकांसोबत मिळून 11 सायकली आणि मौल्यवान वस्तू व काही महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याचा आरोप केला होता.

(Bigg Boss EX Contestant Swami Om Passes away)

हेही वाचा :

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.