AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Jaya Bachchan | हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे झाले जया-अमिताभचे लग्न, वाचा किस्सा…

‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Happy Birthday Jaya Bachchan | हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे झाले जया-अमिताभचे लग्न, वाचा किस्सा...
जया आणि अमिताभ बच्चन
| Updated on: Apr 09, 2021 | 10:54 AM
Share

मुंबई : लग्नानंतर जया बच्चन (Jaya Bachchan) बनलेल्या अभिनेत्री जया भादुरी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. सत्यजित रे आणि हृषिकेश मुखर्जी यासारख्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांच्यातील अभिनयाची प्रतिभा ओळखली होती. चित्रपटसृष्टीबरोबरच राजकारणातही नाव कमवणाऱ्या अशा मोजक्या कलाकारांपैकी जया बच्चन एक आहेत. चित्रपटांमध्ये सक्रिय असताना त्यांनी तीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि तीन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारांसह नऊ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत लग्न गाठ बांधून त्यांनी बच्चन कुटुंबात प्रवेश केला. मात्र, हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे हे लग्न पार पडले होते (Happy Birthday Jaya Bachchan interesting story behind Jaya and Amitabh Bachchan marriage).

जया यांनी 3 जून 1973 रोजी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केले. ‘बाबूजीं’च्या एका अटीवर या दोघांचे लग्न झाले होते. चला तर, जया बच्चन यांच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने हा मनोरंजक किस्सा जाणून घेऊया…

वयाच्या 15व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण

जया बच्चन यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. 1963 मध्ये सत्यजित रे यांचा बंगाली चित्रपट ‘महानगर’मध्ये जया यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. येथूनच जया यांनी स्वप्न जगण्यास सुरुवात केली. 1971मध्ये ‘गुड्डी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर अभिनेत्रीने ‘मिली’, ‘चुपके चुपके’, ‘जंजीर’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले (Happy Birthday Jaya Bachchan interesting story behind Jaya and Amitabh Bachchan marriage).

असे जुळते सूत

‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जया भादुरी आणि राजेश खन्ना एकत्र काम करत असलेल्या ‘बावर्ची’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ सतत जया यांना भेटायला जात असत आणि त्यामुळे दोघांचे प्रेम आणखी वाढत गेले.

हरिवंशराय बच्चन यांची अट

मात्र, अमिताभ आणि जया यांचे लग्न अचानक झाले होते. ‘जंजीर’ चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते, जया देखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र, वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावे लागले.

खरं तर, लंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जया देखील आहेत, हे जेव्हा हरिवंश राय बच्चन यांना समजले तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचे असेल तर, दोघांनाही आधी लग्न करावे लागेल. याच कारणास्तव, दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी 3 जून 1973 रोजी एका साध्या घरगुती सोहळ्यात लग्न केले आणि त्याच दिवशी दोघे हनिमूनसाठी थेट लंडनला रवाना झाले होते.

(Happy Birthday Jaya Bachchan interesting story behind Jaya and Amitabh Bachchan marriage)

हेही वाचा :

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ आता बनलीय शायर, वाचा तिची मजेशीर शायरी…

‘देवमाणूस’ ज्यापासून प्रेरित, त्या डॉ. संतोष पोळने जिवंतपणी गाडले सहा जणांना

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.