AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणधीर कपूर यांच्या प्रकृतीविषयी रणबीरने दिली खोटी माहिती? नेमकं काय आहे प्रकरण?

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. कपूर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून हा त्यांचा चित्रपट पाहिला. यावेळी ऋषी कपूर यांचे मोठे भाऊ रणधीरसुद्धा (Randhir Kapoor) उपस्थित होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर रणधीर कपूर असं काही म्हणाले, जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

रणधीर कपूर यांच्या प्रकृतीविषयी रणबीरने दिली खोटी माहिती? नेमकं काय आहे प्रकरण?
Ranbir and Randhir KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 4:39 PM

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. कपूर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून हा त्यांचा चित्रपट पाहिला. यावेळी ऋषी कपूर यांचे मोठे भाऊ रणधीरसुद्धा (Randhir Kapoor) उपस्थित होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर रणधीर कपूर असं काही म्हणाले, जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. याबाबत अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला. “काकांनी शर्माजी नमकीन हा चित्रपट पाहिला आणि ते म्हणाले की, ऋषीला फोन लाव. मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्याच्या कामाचं कौतुक करायचं आहे. त्याने खूप चांगलं काम केलंय आणि मला हे त्याला सांगायचं आहे”, असं ते रणबीरला म्हणत होते. रणधीर कपूर यांना डिमेंशिया (dementia) हा आजार असल्याचंही त्याने या मुलाखतीत सांगितलं. ऋषी कपूर यांनी 29 एप्रिल 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला. त्याआधी त्यांनी ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटात काम केलं होतं.

रणबीरच्या या मुलाखतीनंतर रणधीर कपूर यांच्या आरोग्याविषयी चर्चा होऊ लागल्या. मात्र ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रणधीर यांनी त्यांना डिमेंशिया असल्याचं स्पष्टपणे नाकारलं. तुमच्यात स्मृतिभ्रंशाची सुरुवातीची लक्षणं दिसत असल्याचं रणबीरने मुलाखतीत म्हटलंय असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावर ते हसले आणि म्हणाले, “असं काही नाहीये. मी एकदम ठीक आहे. गेल्या वर्षी मला कोविडची लागण झाली होती. पण मी पूर्णपणे बरा आहे.” मग रणबीरने असं का म्हटलं, असा प्रश्न विचारला असता ते पुढे म्हणाले, “रणबीरची मर्जी, त्याला जे म्हणायचंय तो ते म्हणू शकतो.” यावेळी रणधीर कपूर यांनी ऋषी कपूर यांची आठवण काढल्याचंही नाकारलं. “मी असं काही म्हणालोच नाही. मी ठीक आहे. मी राहुल रावैलसोबत गोव्याहून परतलो आहे. आम्ही गोवा फेस्टिव्हलला हजेरी लावली होती”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ऋषी कपूर यांच्या ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटातील काही सीन्स चित्रीत करायची राहिली होती. मात्र त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटातील उर्वरित दृश्ये पूर्ण केली. ऋषी कपूर यांचा हा चित्रपट मला खूप आवडला, अशा शब्दांत रणधीर यांनी यावेळी कौतुकसुद्धा केलं. हा चित्रपट 31 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

हेही वाचा:

‘असले घाण आरोपही कोणी लावू नका’; म्हणत विशाखा सुभेदारने घेतला मोठा निर्णय

Mumbai: निवेदिता सराफ यांच्यासमोर ड्राइव्हरला बेदम मारहाण

भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल....
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल.....
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!.
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.