Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loudspeaker Row: राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर काय म्हणाला सोनू सूद?

भोंग्यांच्या वादावर आता अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) प्रतिक्रिया दिली आहे. "धर्म, जात यातून बाहेर पडलो तरच देशाचा विकास होईल. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे तीच ताकद नमाजमध्येही आहे. देशात इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत," असं तो म्हणाला.

Loudspeaker Row: राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर काय म्हणाला सोनू सूद?
Sonu Sood, Raj ThackerayImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 4:53 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी पुन्हा एकदा भोंग्यांवरून राज्य सरकारला इशारा दिला. “एका दिवसापुरतं हे आंदोलन नाही. आमचं आंदोलन सुरूच राहणार. जोपर्यंत मशिदींवरील भोंगे (LoudSpeakers) उतरवले जात नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार,” असं सांगतानाच राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या डेसिबलचीही आठवण करून दिली. “सकाळच्या अजानपुरता हा विषय नाही. चार ते पाच वेळा बांग दिली जाते. ती जर त्यांनी परत दिली. तर आमचे लोकं हनुमान चालिसा त्या त्या वेळी वाजवणार म्हणजे वाजवणारच,” असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. या सर्व वादावर आता अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) प्रतिक्रिया दिली आहे. “धर्म, जात यातून बाहेर पडलो तरच देशाचा विकास होईल. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे तीच ताकद नमाजमध्येही आहे. देशात इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत,” असं तो म्हणाला.

काय म्हणाला सोनू सूद?

“धर्म, जात यातून बाहेर पडलो तरच देशाचा विकास होईल. देशातील जनतेनं एकत्र येणं महत्वाचं आहे. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे तीच ताकद नमाजमध्येही आहे. हनुमान चालीसा जेवढी चांगली वाटते, तेवढंच नमाज ऐकण्यात चांगलं वाटतं. धर्म हा लोकांनी बनवलाय आणि यातून बाहेर पडण्याची आपल्याला फार गरज आहे. देशात अजूनही खूप मोठे मोठे मुद्दे आहेत. आपण यातच अडकून पडलो तर लोकांच्या अडचणी सुटणार नाहीत. आपण अगोदर याचा विचार करायला हवा. बाकीच्या गोष्टींना महत्व देण्याची गरज नाही,” असं तो म्हणाला.

“राजकारण्यांनी तळागाळातील सामान्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत. लोकांना फरक पडत नाही की लाऊडस्पीकरवर काय सुरू आहे. लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया त्याने भोंग्यांच्या मुद्दयावर दिली.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले राज ठाकरे?

“मशिदीवरील भोंगेच उतरवा. तुम्हाला प्रार्थना म्हणायचीये तर म्हणा. तुम्हाला लाऊडस्पीकर का लागतो? कुणाला ऐकवायची आहे. जोपर्यंत भोंगे उतरवले जाणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. निर्णय लागत नाही, तोपर्यंत असंच सुरू राहणार. सरकार म्हणते आम्ही आदेशाचं पालन करतो तर सर्व करा. सकाळी अजान झाली म्हणजे आम्ही खूश झालो असं अजिबात नाही. दिवसभरातील अजान भोंग्यावरून नको. तर हनुमान चालिसा चालूच राहणार,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.