AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दलजीत कौरच्या आरोपांवर अखेर निखिलने सोडलं मौन; सांगितलं लग्न मोडल्याचं कारण

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर लग्नानंतर केन्याला स्थायिक झाली होती. मात्र दहा महिन्यांतच ती तिच्या मुलासोबत भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर तिने पती निखिल पटेलवर बरेच आरोप केले आहेत.

दलजीत कौरच्या आरोपांवर अखेर निखिलने सोडलं मौन; सांगितलं लग्न मोडल्याचं कारण
दलजीत कौर, निखिल पटेलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 3:32 PM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी मुंबईत धूमधडाक्यात लग्न केलं. या लग्नानंतर ती मुलगा जेडनसोबत केन्याला स्थायिक झाली होती. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच दलजीत आणि निखिल यांच्या नात्यात समस्या निर्माण होऊ लागल्या. अखेर लग्नाच्या दहा महिन्यांतच दलजीत तिच्या मुलाला घेऊन भारतात परतली. भारतात आल्यानंतर तिने निखिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर निखिलने लग्नाला मान्यता देण्यास नकार दिल्याचंही तिने म्हटलंय. या सर्व आरोपांवर अखेर निखिलने मौन सोडलं आहे.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत निखिल म्हणाला, “यावर्षी जानेवारी महिन्यात दलजीतने मुलाला घेऊन भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही तिथेच विभक्त झालो. आमच्या या मिश्र कुटुंबाचा पाया तितका मजबूत बनू शकला नाही जितकी आम्हाला अपेक्षा होती. त्यामुळे दलजीतला केन्यामध्ये राहणं जमत नव्हतं. मार्च 2023 मध्ये आम्ही मुंबईत भारतीय विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. या विवाहाला सांस्कृतिक मान्यता असली तरी ते कायदेशीररित्या बंधनकारक नाही. त्या सोहळ्याचा हेतू हाच होता की दलजीत माझ्यासोबत केन्याला शिफ्ट होणार असल्याचं आश्वासन तिच्या कुटुंबाला मिळावं. आमच्या अनेक प्रयत्नांनंतरही दलजीतसाठी केन्यामध्ये राहणं खूप आव्हानात्मक झालं होतं. तिला भारतातील तिच्या करिअरची आणि आयुष्याची खूप आठवण येत होती. त्यामुळे वैवाहिक आयुष्यातील ही गुंतागुंत वाढतच गेली.”

हे सुद्धा वाचा

“सांस्कृतिक विविधता, एकमेकांची मूल्ये आणि विश्वास या सर्व गोष्टींमध्ये भिन्नता असल्याने दिवसेंदिवस आमच्या नात्यासाठी हे नवीन आव्हान ठरत होतं. दलजीतने ज्यादिवशी केन्यामधून निघून जाण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी तिने मला, तिच्या मुलाच्या शाळेत आणि इतरांना कळवलं होतं. तिचं बाकीचं सामान घेण्याशिवाय तिला परत केन्याला यायचंच नव्हतं. मी तिचं सर्व सामान सुरक्षितरित्या ठेवलं आहे. तिचं निघून जाणं हे माझ्यासाठी आमच्या नात्याचा शेवटच होता. पण सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिने माझ्यावर जे आरोप केले, त्यामुळे माझ्या कुटुंबाला आणि मित्रमैत्रिणींना विनाकारण शोषणाला सामोरं जावं लागतंय. तिने तिच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने तिचं हे वागणं थांबवावं अशी माझी अपेक्षा आहे,” असं तो पुढे म्हणाला.

इतकंच नव्हे तर निखिलने दलजीतला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी गोष्टी स्पष्ट केलेल्या बऱ्या, असं त्याने सांगितलं.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.